बडोदा येथे होणार्या विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी नाशिकचा डावखुरा गोलंदाज सत्यजीत बच्छाव याची निवड झाली असून या स्पर्धा 24 सप्टेंबर पासून ते 13 ऑक्टोबर पर्यन्त खेळल्या जाणार आहेत.
बीसीसीआयतर्फे दरवर्षी घेतल्या जाणार्या या सर्धेमध्ये काल संघाची निवड करण्यात आली. केदार जाधव याच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाराष्ट्र संघामध्ये नाशिकच्या सत्यजीत बच्छावची निवड करण्यात आली असून नाशिक गेल्या वर्षी झालेल्या मुस्ताक अली ट्रॉफी T-20 स्पर्धेमध्ये सर्वाधिक फलंदाज बाद केलेले आहे. यापूर्वी रणजी आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेमध्ये देखील सत्यजीतने चमकदार कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न असेल.
या स्पर्धेसाठी फारच उत्साही आहे. नेहमीप्रमाणे या वेळीही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न असेल, जेणेकरून संघाला त्याचा नक्कीच फायदा होईल. नेहमीप्रमाणे आमचा यावेळचा संघ चांगला असून या वेळीही आमची कामगिरी चांगली राहणार असून ही ट्रॉफी जिंकण्याचा विश्वास आहे. -सत्यजीत बच्छाव, डावखुरा गोलंदाज
असा आहे संघ
केदार जाधव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, स्वप्नील गुगले, यश नहार, नौशाद शेख, सत्यजीत बच्छाव, शामशुझामा काझी, अजीम काझी, दिव्यांग हिंगणेकर, अवधूत दांडेकर, मनोज यादव, मुकेश चौधरी, समाद फल्लाद, निकीत धुमाळ.