घरमहाराष्ट्रनिसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका

निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका

Subscribe

जोरदार वादळी वार्‍यासह आलेल्या निसर्ग चक्री वादळाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या रौद्ररूपामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विजेचे खांब कोसळले असून वीजपुरवठा खंडित झाला होता. आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्द स्तरावर सुरू केले. अनेक भागात आता वीज पुरवठा पूर्ववत झाला आहे. महावितरणच्या तंत्रज्ञांच्या टीमने घेतलेल्या अथक मेहनतीमुळेच हे शक्य झाले आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने उरण या उपकेंद्रासह कांडलगाव, पाबरा व थल या प्रत्येकी १०० कि.व्हो. उपकेंद्रांतर्गत येणार्‍या उरण, अलीबाग, मुरूड, तळा, मानगाव, मसाळा, श्रीवर्धने व गोरेगाव या तालुकाच्या ठिकाणी असलेल्या २२ कि.व्हो. उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद केला होता. या वीज बंदमुळे आठ तालुक्यातील सुमारे २ लाख ६८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता.

- Advertisement -

या वादळामुळे ६ बाय ६ उंचीचे ३ खांब गोंडघर इनकमर वीजवाहिन्या तुटून खाडीत कोसळल्या. चक्रीवादळामुळे अंबरले येथील एक रोहीत्र आणि ३ उच्चदाब खांब कोसळून पडले. वडाचा कोंड येथे एका रोहित्राचा खांब वाकला. लोणेरे येथील एक लघुदाब खांब कोसळून पडला. वाशी येथील 22 के. व्ही फीडर ट्रिप झाला होता. करंजाडे, बौध्दवाडा रस्त्यालगतचे तसेच घोटगाव येथील खांबावर झाड पडल्याने खांब कोसळून पडलेत. तुर्भे एम.आय.डी. सी. येथील 22/22 के व्ही. सबस्टेशनची कंपाउंड भिंतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

कल्याण परिमंडलातही वीजपुरवठा बाधित झाला होता. याशिवाय झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा बाधित झाला. कल्याण पश्चिममधील बारावे, रामबाग, शिवाजी चौक, रहेजा, कल्याण पूर्वमधील वालधुनी, ठाकुर्ली, काटे मानिवली, चिंचपाडा, डोंबिवलीतील कोपर रोड, नांदीवली, आजदे, नवपाडा भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.

- Advertisement -

पुणे जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून सुरु असलेल्या ‘निसर्ग’ वादळाच्या थैमानात वीज यंत्रणेवर मोठा आघात झाला आहे. वीज यंत्रणेवर मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने प्राथमिक माहितीनुसार सुमारे ५४० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. यामध्ये प्रामुख्याने मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांमधील 340 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे शहराच्या विविध भागात तसेच पिंपरी चिंचवड व भोसरीमधील बहुतांश भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला.

निसर्ग चक्री वादळामुळे महावितरणच्या यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे चक्री वादळ राज्यात दोन दिवस घोंघवर असून या वादळाचा सामना करण्यास वीज कंपन्या सज्ज असल्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले. या वादळाच्या अनुषंगाने एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून संचालक दर्जाचा अधिकारी नोडल अधिकारी या घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे. नैसर्गिक आपत्ती पासून होणारे नुकसान हे वादळाच्या तीव्रतेवर अवलंबून असून प्रभावित भागांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचा प्राधान्यक्रम ठरवला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -