घरमहाराष्ट्रराम कदम, अवनी वाघीण आणि फोन नंबर!

राम कदम, अवनी वाघीण आणि फोन नंबर!

Subscribe

राम कदम यांचं दहीहंडीदरम्यान केलेलं वक्तव्या त्यांचा अजूनही पिच्छा पुरवत आहे. विधानसभेमध्ये याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी राम कदम यांना गप्प केलं.

विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जशी जोरदार आरोप-प्रत्यारोपांची सरबत्ती होते, तशीच हलकीफुलकी चर्चा आणि वरवर गंमतीची वाटणारी पण चपराक लागल्याप्रमाणे लागणारी कोपरखळीही पाहायला मिळते. महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बुधवारी अशाच प्रकारची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे आमदार राम कदम यांच्यामध्ये पाहायला मिळाली. यावेळी अवनी वाघीण प्रकरणावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान राम कदम यांना जयंत पाटील यांनी त्यांच्या ‘फोन नंबर’ प्रकरणावरून टोचणारी कोपरखळी मारली आणि राम कदम यांना शांत राहायला भाग पाडलं.

अवनी वाघीण आणि सुधीर मुनगंटीवार

अवनी वाघीण मृत्यू प्रकरणावरून जयंत पाटील यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर यावेळी बोलताना निशाणा साधला. ‘प्रचंड मोठ्या प्रमाणावर यंत्रणा जंगलामध्ये पेरून देखील अवनी वाघिणीला तुम्ही ट्रॅन्क्वेलायझर न देता गोळ्या घातल्या’, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी मुनगंटीवार यांना सुनावलं. मात्र, नेमक्या त्याच वेळी आमदार राम कदम अवनी वाघीण प्रकरणावरूनच जयंत पाटील यांच्या बोलण्यात अडथळा आणू लागले. पण विधान भवनामध्ये बोलण्याचा दांडगा अनुभव असलेल्या आणि कसलेल्या जयंत पाटलांनी एकाच मुद्द्यावर राम कदम यांचा अडथळा अगदी अलगद दूर सारला!

- Advertisement -

‘तिने नंबर घेतला नाही हे यांचं दु:ख’!

यावेळी राम कदम बोलण्यात अडथळा आणत आहेत हे लक्षात येताच जयंत पाटील यांनी अवनी वाघिणीवरून थेट राम कदम यांच्या दहहंडीदरम्यान केलेल्या ‘फोन नंबर’ वक्तव्यावर उडी घेतली. त्यामुळे राम कदम यांना सर्व आवेश बाजूला ठेऊन पुन्हा शांत होऊन जयंत पाटील यांचं भाषण ऐकत राहावं लागलं.

जयंत पाटील म्हणाले….
अध्यक्ष महोदय यांना खाली बसवा. अहो राम कदम, तुमचं कौतुक संपूर्ण महाराष्टट्र करतोय. अवनी वाघिणीने तुमचा फोन नंबर घेतला नाही, ही तुमची समस्या आहे. तुमचं कौतुक भाजपमधूनही होत आहे. त्याबद्दल तुम्हाला तोड नाही. तुम्ही खाली बसा.

- Advertisement -

काय म्हणाले होते राम कदम?

दहीहंडी उत्सवादरम्यान राम कदम यांनी केलेलं एक वक्तव्य प्रचंड गाजलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली होती. महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून राम कदम यांनी स्वपक्षीयांचा देखील रोष ओढवून घेतला होता. दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये सर्वांसमोर, ‘तुम्हाला जर एखादी मुलगी आवडत असेल आणि ती नाही म्हणत असेल तर मला सांगा, मी तिला पळवून आणून तुम्हाला देणार, यासाठी माझा फोन नंबर घ्या’, असं वक्तव्य राम कदम यांनी केलं होतं.


राम कदम यांच्या वक्तव्याचा इथे पाहा व्हिडिओ – अहो राम कदम, महिलांबद्दल हे काय बोलून बसलात?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -