घरमहाराष्ट्र‘पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच राष्ट्रवादी जिंकणार सर्वाधिक जागा’

‘पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच राष्ट्रवादी जिंकणार सर्वाधिक जागा’

Subscribe

मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांचा विश्वास

मागच्यावेळी शिवसेनाभाजपा ४२ जागा जिंकली होती परंतु यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस २२ जागांच्यावर विजय मिळवेलच पण पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच महाराष्ट्रात राष्ट्रवादी सर्वाधिक जागा जिंकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. उद्याच्या लोकसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

सध्या येणारे एक्झिट पोल ठिक आहेत. ते आपापल्या परीने मांडले जात आहेत. परंतु यावेळी महाराष्ट्रात आम्ही जो पक्षाच्या स्थापनेनंतर विजय मिळाला नव्हता असा विजय आम्ही प्राप्त करणार आहोत असा आत्मविश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

कोर्टाने पहिल्यांदा व्हिव्हीपॅट स्लीप मोजायला सांगितली आहे नंतर ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मशीनची मोजणी केली जावी. म्हणजे ज्या शंका होत्या त्या समजावून सांगितल्या आहेत. पाच ईव्हीएम मशीनची मोजणी करण्यात यावी असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. प्रश्न ईव्हीएमचा नाही, प्रश्न जिंकण्याचा किंवा पराभूत होण्याचा नाही तर देशात लोकशाहीच्या प्रती विश्वास निर्माण करण्याचा आहे. जर लोकांच्या मनात शंका निर्माण होत असेल तर निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की, विश्वास निर्माण केला पाहिजे. परंतु निवडणूक आयोग ज्याप्रकारे व्यवहार करत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात शंका अजुन वाढू लागली आहे.हे निवडणूक आयोगाला समजायला हवे असे खडेबोल सुनावले आहेत.

देशात त्रिशंकू लोकसभा होणार आहे. यावर आमचा पुर्ण विश्वास आहे. त्यामुळे एनडीएला बहुमत मिळणार नाही. राष्ट्रवादीने वारंवार सांगितले आहे की आमची मर्यादित ताकद आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या पदाचा दावा करणार नाही. आणि पवारसाहेब यांनीही वारंवार स्पष्ट केले आहे की या पदाचे ते दावेदार नाहीत परंतु ते पर्यायी सरकार बनवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -