घरमहाराष्ट्रविखे पाटलांचा नवा अजेंडा

विखे पाटलांचा नवा अजेंडा

Subscribe

नगरमधील १२ जागांवर भाजपचे लक्ष्य

काँग्रेसमधून भाजपत आलेले राधाकृष्ण विखे पाटील आता अहमदनगरमध्ये होणार्‍या महाजनादेश यात्रेच्या तयारीला लागले आहेत. २४ ऑगस्ट रोजी शहरात जाहीर सभा होणार आहे, त्याच्या नियोजनासाठी मंत्री विखे यांच्या उपस्थितीत शहरात भाजपची बैठक पार पडली.

विखे पाटील यावेळी म्हणाले की, महाजनादेश यात्रा दोन दिवस नगर जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात होणार्‍या सर्व सभा भव्यच होणार आहेत. नगर शहरातही सभा होणार आहे. पालकमंत्री राम शिंदे, दिलीप गांधी आणि मी यासाठी नियोजन करत आहोत. जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकण्याची पायाभरणी या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून होणार असल्याचे विखे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

- Advertisement -

‘अबकी बार २२० पार’अशी घोषणा भाजपने केली आहे. हे यश भाजप मिळवणारच असून, यात नगर जिल्हा पूर्ण सहभागी असणार आहे. जिल्ह्यातील सर्व १२ जागा भाजप जिंकणार आहे, असा दावा यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

अहमदनगरचे माजी खासदार दिलीप गांधी यावेळी म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी महाजनादेश यात्रा संपूर्ण राज्यात जात आहे. नगरमध्ये या यात्रेचे जोरदार स्वागत आपल्याला करायचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -