घरमहाराष्ट्रएकच प्याला जिवावर घाला

एकच प्याला जिवावर घाला

Subscribe

कोल्हापुर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे दारुचे पैसे न दिल्याच्या वादातून एकाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोन जणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

दारुच्या एका घोटासाठी मित्रांनीच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. मद्यप्राशन करण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली. इचलकरंजी येथील कबनूर गावात ही घटना घडली असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी रजाक शेख आणि इस्माईल शेख यांना अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

कोल्हापुर जिल्ह्यातील इचलकरंजी मधील स्वामी मळ्यात विजय सरदेसाई राहत तो यंत्रमाग कामगार म्हणून काम करायचा. शनिवारी विजय आपला मित्र रजाक शेखच्या सोबत जवाहरन या देशी दारुच्या दुकानात मद्यप्राशन करण्यासाठी गेला होता. त्यानंतर या दोघांनी त्यांचा मित्र इस्माईल शेख याला देखील फोन करुन मद्यप्राशन करण्यास बोलावून घेतले. त्याठिकाणी इस्माईल शेख आल्यायानंतर या तिघांनी मद्यपान केले. मात्र पैसे देण्याच्या वेळी त्यांच्यात आपापसात वाद झाला.

- Advertisement -

अखेर हे तिघेही दुचाकीवरुन फरांडे मळा येथे पोहोचले. त्याठिकाणी पोहचल्यानंतर त्यांच्यात पुन्हा मद्यपानाच्या पैशाचा वाद सुरु झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. रजाक आणि इस्माईल याने विजयचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र विजयने दोघांना झिडकारुन लावले. इस्माईल याने विजयचा हात पकडला आणि रजाकने त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यात विजय गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. विजयची काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून रजाक आणि इस्माईल यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. अखेर याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी रजाक शेख आणि इस्माईल शेख यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी विजयच्या खुनाची कबुली दिली. याप्रकरणी रजाक शेख आणि इस्माईल शेख या दोन्ही आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -