घरमहाराष्ट्रकोर्टात मिळाला ७५ कुटुंबांना आसरा

कोर्टात मिळाला ७५ कुटुंबांना आसरा

Subscribe

कोल्हापूर जिल्हाकोर्टात पुरामध्ये अडकलेल्या ७५ कुटुंबाना आसरा देण्यात आला.

कोर्टाची पायरी नको रे बाबा, अशी प्रतिक्रिया नेहमीच अनेकांची असते. पण हेच नकोसे वाटणारे कोर्ट आता कोल्हापूरच्या ७५ कुटुंबांना हवेहवेसे वाटू लागले आहे. कोल्हापूर जिल्हाकोर्टात पुरामध्ये अडकलेल्या ७५ कुटुंबाना आसरा देण्यात आला. बावड्यामध्ये राहणारी ही सर्व कुटूंब असून या कुटुंबांना नुसता आसराच नाही तर त्यांची सर्व व्यवस्था देखील केली गेली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूरच्या वतीने ही सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

रोज ३०० हून अधिक लोकांना मिळते जेवण

या न्यायालयात सुरुवातीला ७५ कुटुंबांना ठेवण्यात आले. मात्र जसेजसे पाणी ओसरू लागले, तशी इतर कुटुंब आपल्या नातेवाईंकाकडे तर काही जण आपल्या घरी गेली. त्यामुळे आता अजून ११ कुटूंब या न्यायालयात राहत असून येथे सकाळचा नास्ता ते रात्रीचे जेवण याची व्यवस्था एवढच नाही तर डॉक्टर देखील उपलब्ध करूनही देण्यात येत आहे.

- Advertisement -

कोर्टाची पायरी चढायला घाबरणाऱ्या सर्वसामान्यांना कोर्टाने दिला आधार

कोर्टाची पायरी चढायला घाबरणाऱ्या सर्वसामान्यांना कोर्टाने दिला आधार

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 11, 2019

कोर्टाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ 

दरम्यान, कोल्हापूरात भयंकर महापूर आला होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरनाणे पूर बाधितांची राहण्याची वेळ केली. मात्र असा पूर हा पहिल्यांदा आल्याने कोर्टाने देखील इतिहासात पहिल्यादाच ही पाहिली असेल असे अधीक्षका विना कट्टी यांनी यांनी सांगितले.

- Advertisement -

सध्या कोल्हापुरात मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था धावून येत असून, अशीच मदत जिल्हा न्यायालयात असलेल्या कुटूंबाना देखील मिळत असून, कुणी कपडे, कुणी अन्न धान्य तर कुणी दुधाची तसेच इतर पदार्थांची व्यवस्था देखील करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -