घरमहाराष्ट्रपक्षांतर करुन पुन्हा निवडून येऊन दाखवाच

पक्षांतर करुन पुन्हा निवडून येऊन दाखवाच

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे फुटीरांना आव्हान

सरकार स्थापन करायचे तर शिवसनेला सोबत घ्यायचे किंवा शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार फोडायचे आणि सरकार स्थापन करायचे. वेळप्रसंगी या आमदारांना राजीनामा द्यायला सांगून पुन्हा निवडून आणायचे असा भाजपचा विचार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमिवर प्रसारमांध्यमांनी विचारले असता जयंत पाटील बोलत होते.

या वेळी बोलताना ‘पक्षांतर करुन पुन्हा निवडून येऊन दाखवाच’, असे थेट आव्हान जयंत पाटील यांनी भाजप आणि फुटीरतावाद्यांना दिले. विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांतील नेत्यांची पक्षांतरे करुन मेगा भरती करणार्‍या भारतीय जनता पक्ष आणि फुटीरतावाद्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट आव्हान दिले आहे.

- Advertisement -

फुटीरांना योग्य ती जागा दाखवली जाईल. आता पहिल्यासारखी स्थिती राहिलेली नाही. असे जर कोणी फुटून गेले तर भाजप वगळता सर्वपक्षीय एकत्र येऊन पुन्हा आमचाच उमेदवार निवडून आणतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांना भाजपने आपल्या पक्षात घेतले होते. मात्र, पक्षांतर करणार्‍यांना जनतेनेच धडा शिकवला याकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -