घरमहाराष्ट्रशिवसेना हा लाचारांचा पक्ष - गणेश नाईक

शिवसेना हा लाचारांचा पक्ष – गणेश नाईक

Subscribe

पूर्वीची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेमध्ये फरक आहे. बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती, मात्र आताची शिवसेना ही लाचारांची आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-रिपाई (क)-रिपाई (से)-मनसे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार बाबाजी बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ अंबरनाथमध्ये कार्यकर्ता मेळावा अंबरनाथ पूर्वेकडील रोटरी सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात नाईक यांनी अशी टीका केली की, पूर्वीची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेमध्ये फरक आहे. बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती, मात्र आताची शिवसेना ही लाचारांची आहे. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

यावेळी, उद्धव ठाकरे यांनी खोटारडेपणाचा मुखवटा धारण केला आहे. आधी त्यांनी अमित शहाची तुलना अफजल खानशी केली आता त्याची गळाभेट घेत आहेत, यावेळी मोदी सरकारवर ही जोरदार टीका केली. ५ वर्षात जी फेकूगिरी झाली. त्यात जनतेच्या स्वप्नांचा चुराडा झालेला आहे, असे ते म्हणाले.

- Advertisement -

या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादीचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केले होते. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी पालकमंत्री गणेश नाईक, प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक, गुलाबराव करंजुले-पाटील, आमदार ज्योती कलानी, राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष पुष्पराज गायकवाड, युवक अध्यक्ष अभिजित करंजुले-पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनील अहिरे, प्रफुल थोरात, काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप पाटील, कमलाकर सूर्यवंशी, नगरसेवक उमेश पाटील, पंकज पाटील, रिपाई सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड, मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -