घरमहाराष्ट्रशिवसेनेच्या नेत्यांनाच सरकार पडणार असल्याची सारखी भीती वाटतेय - प्रविण दरेकर

शिवसेनेच्या नेत्यांनाच सरकार पडणार असल्याची सारखी भीती वाटतेय – प्रविण दरेकर

Subscribe

राज्यातील सरकार पाडून दाखवा… पाडून दाखवा… असे कोणीही बोलले नसताना त्यांना केवळ भीतीने ग्रासले आहे. म्हणूनच त्यांनाच स्वत: सरकार पडणार असल्याची सारखी भीती वाटत असावी, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

शिवसेना नेते संजय राऊत यांना माध्यमांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही, पोटशूळ बाहेर काढल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही. सरकारने एक वर्षे पूर्ण केल्याचे राऊत सांगत आहेत, पण सरकारचा कारभार कोणीही करीत असतो, गाडी पुढे जात असते, पण या एका वर्षात काय केले असा सवाल प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही, शेतकरी अतिवृष्टीने हैराण झाला आहे, कोकणात निर्सग वादळातील शेतकऱ्यांना मदत नाही, कामगार बेजार आहेत, बेरोजगारीचे करार करतात पण प्रत्यक्षात काही होत नाही, आजही कोविड नियंत्रणात आणू शकत नाही, या परिस्थितीत आमच्या सरकारने एक वर्षे पूर्ण केले अशा गमजा ते मारत असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.

- Advertisement -

ऑपरेशन लोटसबाबत आम्ही काहीच बोललो नाही. तेच म्हणतात की, यामुळे साधे खरचटले नाही, पण भाजपने काही ठरविले तर खरचटायचे तर दूर राहिले, रक्तबंबाळ व्हाल असा इशारा देतानाच दरेकर म्हणाले की, थडगी उकरून काढण्यची भाषा राऊत करीत आहे, पण बोलायला फक्त त्यांनाच येते असे त्यांनी समजू नये. सगळ्यांना बोलायला येते. मग थडगी काय आणि दुसरे काय सर्वांनाच पर्दाफाश करता येईल, त्यामुळे कोणी आव्हान देण्याची भाषा करु नये, असा इशाराही दरेकर यांनी दिला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -