घरमहाराष्ट्रपळसदरी पुलाला कठड्याची गरज

पळसदरी पुलाला कठड्याची गरज

Subscribe

घोडवली ते पळसदरी मार्गावर संरक्षक कठडे नसलेला पूल रहदारीसाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे स्थानिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत हा रस्ता तयार करण्यात आला होता. खालापूर हद्दीत घोडवली मार्गे कर्जत-पळसदरी मार्गाला जोड रस्ता आहे. केळवली रेल्वे स्थानक, तसेच कर्जतला जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा असल्याने कामगार, विद्यार्थी, व्यापारी यांची मोठ्या प्रमाणात मार्गावरून वर्दळ असते. पुलाखालून वाहणारा नाला पावसात तुडुंब भरून वाहत असून, आधीच जुना पूल तोही संरक्षक कठड्यविना असल्यामुळे पुलावरून जाताना भीती वाटत असल्याचे घोडवलीचे रहिवासी कृष्णा शिंदे यांनी ‘आपलं महानगर’ला दिली. रात्रीच्या वेळी तर अपघाताची दाट शक्यता असते. या अगोदर पुलावर अपघात झाले आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत हा रस्ता तयार करण्यात आला होता. महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे बांधकाम विभागाने लक्ष देऊन संरक्षक कठडे बसविण्याची मागणी होत आहे.

पुलाची दुरुस्ती आणि संरक्षक कठड्यांचे काम होणे गरजेचे आहे. पूल जुना असल्यामुळे नवीन पूल बांधणे गरजेचे आहे.
-अक्षय पिंगळे, सदस्य, खालापूर पंचायत समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -