घरमहाराष्ट्रसरकारी तिजोरी रिकामी

सरकारी तिजोरी रिकामी

Subscribe

कर्मचार्‍यांचा पुढील महिन्याचा पगार कापणार

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीशी सामना करताना राज्य सरकार आर्थिक संकटात सापडले आहे. राज्याची तिजोरी खाली झाली असताना पुढील महिन्यात राज्य सरकारी कर्मचार्‍यांना पगार द्यायलाही राज्य सरकारकडे पैसे नाही. त्यामुळे कर्ज काढण्याच्या विचारात राज्य सरकार असताना चार महत्त्वाचे विभाग वगळता इतर विभागांच्या कर्मचार्‍यांचे पगार कमी केले जाऊ शकतात, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुण्यात सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले की, कोरोनासाठी काम करतात त्यांचा पगार व्यवस्थित होईल. परंतु, इतरांबाबत थोडेसे मागे पुढे होऊ शकते. चार महत्त्वाचे विभाग वगळता इतर विभागांमध्ये काटछाट करण्याची वेळ येऊ शकते.

वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकारकडून कोणतीही मदत झालेली नाही. पीएम केअर फंडाला मदत करा, असे सांगणारे महाराष्ट्रद्रोही आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे अजूनही सत्ता गेल्याच्या शॉकमधून बाहेर येऊ शकलेले नाहीत, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

सारथीबद्दल काहीजण गैरसमज पसरवताहेत. यावेळी ते म्हणाले की, सारथी संस्था सुरू राहील. यावर्षी देखील सारथी संस्थेसाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, सारथीबद्दल काहीजण गैरसमज पसरवून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे राजकारण कोण करतेय याबद्दल मी आत्ता बोलणार नाही, असे ते म्हणाले.

वडेट्टीवार म्हणाले की, सारथीच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. फक्त प्रशिक्षण देण्यापुरती सारथी मर्यादित राहणार नाही. सारथीला साधारणपणे 38 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. येणार्‍या कॅबिनेट मिटींगमध्ये याचा निर्णय घेणार आहे, असे ते म्हणाले. सारथीला आम्ही आर्थिक मदत नक्की करणार आहोत. पण त्यामध्ये थोडे पुढे मागे होऊ शकते. कारण आधी कोरोनासाठी काम करणार्‍यांना मदत होणे गरजेचे आहे. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती गंभीर आहे आणि ती पुढच्या डिसेंबरपर्यंत चालेल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -