घरमहाराष्ट्रबाळासाहेबांनंतर फायरब्रँड केवळ राज ठाकरे : खोपकर

बाळासाहेबांनंतर फायरब्रँड केवळ राज ठाकरे : खोपकर

Subscribe

ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहे. राज ठाकरेही ठाकरे या ब्रँडचेच घटक आहेत. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, अशा शब्दांत शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली. संजय राऊतांच्या भूमिकेवर मनसेकडून हवा तसा प्रतिसाद न मिळता तिखट प्रतिक्रिया आल्या आहेत. दरम्यान, आता संदीप देशपांडे यांच्यानंतर मनसेच्या सिनेमा विंगचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फायरब्रँड एकच…राजसाहेब ठाकरे, अशा शब्दांत संजय राऊतांना सुनावलं आहे.

“शॅडो संपादक महाशय, अगदी रोखठोकपणे सांगायचं तर महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फायरब्रँड एकच…राजसाहेब ठाकरे. सगळीकडून कोंडीत सापडलात म्हणून लगेच तुम्हाला ठाकरे ब्रँडचं कसं होणार अशी चिंता वाटत असली तरी ती तुमच्यापर्यंतच ठेवा. मनसैनिकांना राज ठाकरे या ब्रँडबद्दल, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल कधीही शंका नव्हती आणि भविष्यात कधी असणार नाही. तुम्ही तुमचा स्वाभिमान गुंडाळून ठेवलाय, पण त्यात आमच्या राजसाहेबांना खेचू नका. एक मात्र खरं, तुमचा आवाज लेख सगळीकडे व्हायरल झालाय तो राजसाहेबांच्या उल्लेखामुळेच, हे ध्यानात असू द्या,” असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे.

- Advertisement -

अमेय खोपकर यांच्या आधी संदिप देशपांडे यांनी त्यांची भूमिका मांडली. महाभारतामध्ये कर्णाच्या रथाचं चाक जेव्हा जमिनीत रुतलं होतं तेव्हा कृष्णाने कर्णाला जो प्रश्न विचारला तोच मला आज शिवसेनेला विचारायचा आहे. अभिमन्यू जेव्हा एकटा लढत होता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म कर्णा? असा सवाल संदिप देशपांडे यांनी केला. मी जे बोलतोय ती पक्षाची अधिकृत भूमिका नसून माझं मत आहे. पक्षाची अधिकृत भूमिका राज ठाकरे मांडतील, असं संदिप देशपांडे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -