घरताज्या घडामोडीलवकरच ठाकरे सरकारच्या तीन विकेट पडणार -सोमय्या

लवकरच ठाकरे सरकारच्या तीन विकेट पडणार -सोमय्या

Subscribe

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार आणि परिवहन मंत्री अनिल परब म्हाडा जमीन प्रकरणी घरी बसणार, असे भाकीत भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी वर्तवले आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्य सरकारच्या तीन विकेट पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी किरीट सोमय्या हे शुक्रवारी ठाणे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आले होते. अजूनपर्यंत जितेंद्र आव्हाड यांना कधी जेलमध्ये टाकणार, असा सवाल यावेळी त्यांनी केला. त्यांना अटक का होत नाही, असेही त्यांनी विचारले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजप नगरसेवक मनोहर डुंबरे देखील उपस्थित होते.

- Advertisement -

टीआरपी प्रकरणात ठाकरे सरकार आणि अनिल देशमुख त्या चॅनलवाल्यांना का घाबरत आहेत. एफआयआरमध्ये दुसरेच नाव आहे. तसेच, ठाकरे सरकार आल्यापासून गृहमंत्री अनिल देशमुख चॅनलवाल्यांना जेलमध्ये टाकण्याची का धडपड करत आहेत, असेही ते म्हणाले. विरोधी पक्ष म्हणून आम्ही ‘कोविड-19’मध्ये पूर्ण जबाबदारीने काम करत आहे. कोविड-19 मध्ये किती जण मृत्युमुखी पडले आहे. त्यामुळे हे सरकार त्यांच्या पापाने पडणार, असा खोचक टोला किरीट सोमय्या यांनी यावेळी लगावला आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर एसआरए प्रकरणात खोटे बोलत आहे. तर, याबाबत आम्ही पुढे जनहित याचिका टाकणार आहे. आज विजेचे बिल अव्वाच्या सव्वा आले आहे, ठाकरे सरकार उत्तर देऊ शकले नाही, मला विश्वास आहे आम्हाला न्याय मिळणार, असेही ते म्हणाले. शीतल दामा प्रकरणात अधिकारी आणि काँट्रॅक्टरवर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -