घरमहाराष्ट्रमुंबईत करोनाचे दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर

मुंबईत करोनाचे दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर

Subscribe

12 तासात 7 रुग्ण पॉझिटिव्ह

राज्यात दुसर्‍या स्टेजचा करोना असून गेल्या १२ तासांत ७ रुग्ण करोना विषाणू पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ४८ झाली असून त्यापैकी दोन करोनाग्रस्तांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे काळजी घ्या, गर्दी टाळा, नाहीतर कडक उपाय योजावे लागतील, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

संसर्ग होऊन पॉझिटिव्ह होण्याचं प्रमाण कमी
५० पैकी १० रुग्ण संसर्गाने ग्रस्त झाले आहेत. पण, ४० हे बाहेरुन आलेले रुग्ण आहेत. त्यामुळे, जर संसर्ग थांबवायचा असेल तर गर्दी थांबणं गरजेचं आहे. लोकलमधून संसर्ग वाढण्याचा सर्वात जास्त धोका आहे. पण, महाराष्ट्रात संसर्ग होण्याचे प्रमाण कमी असल्याने ही एक दिलासादायक बाब असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तपासणीसाठी खासगी लॅबने स्वत: खर्च केला.

- Advertisement -

तर परवानगी दिली जाईल. लोकांनी कार्यालयात जाणे टाळले पाहिजे. संबंधित खात्याच्या सचिवांनी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू केले आहेत. कर्मचार्‍यांनी ५० टक्के उपस्थितीचे पालन करावे. संसर्ग टाळण्यासाठी १२ देशांना बंदी घालण्यात आली आहे. घरी एकाकी असलेल्यांनी बाहेर फिरू नये. योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील, असेही टोपे यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र तिसर्‍या टप्प्यात जाणार नाही
महाराष्ट्र तिसर्‍या टप्प्यात जाणार नाही असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला आहे. जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करूनही गर्दी कमी होत नसेल तर रेल्वे बंद करण्याचा निर्णय घ्यावाच लागेल, असेही टोपे यांनी सांगितले. त्यामुळे, सर्वांनी काळजी घ्या, अनावश्यक गर्दी टाळा आणि जर गर्दी कमी झाली नाही तर सरकारला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल. सध्या महाराष्ट्राचा आकडा ४९ वर पोहोचला असून सुदैवाची बाब एवढीच की महाराष्ट्रात संसर्गाचा धोका कमी आहे. ४९ पैकी ४० जण बाहेरुन आले आहेत आणि बाकी ९ जणांना संसर्ग झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -