घरमहाराष्ट्रमोदींनी केलेली टीका गांभीर्याने घेण्यासारखी नसते - शरद पवार

मोदींनी केलेली टीका गांभीर्याने घेण्यासारखी नसते – शरद पवार

Subscribe

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला अनुकूल चित्र दिसत आहे. आपण अनेक निवडणुका पाहिल्या यापुर्वी देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रात एक-दोन वेळा प्रचारासाठी येत होते. आता नरेंद्र मोदी यांना दर दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्रात यावे लागते. यावरून येथील राजकीय हवा बदलत असल्याचे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आज, शनिवारी सकाळी कोल्हापूरात ते पत्रकारांशी बोलत होते.

मोदींविरोधात जनतेमध्ये असंतोष 

२०१४ च्या निवडणुकीत दिलेली आश्वासने मोदी सरकारने न पाळल्याने जनतेमध्ये असंतोष आहे. त्यामुळे रोज एक प्रचाराचे मुद्दे बाहेर काढत आहेत. व्यक्तीगत हल्ले करून त्यातून प्रतिसाद मिळत नसल्याने आता त्यांनी काश्मीरमध्ये काँग्रेस फुटीरवाद्यांसमवेत गेल्याची टीका करत आहेत. त्यांच्या टीकेचा रोक जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याकडे आहे, पण ते आमचे घटकपक्षच नाहीत. उलट भाजपाच त्यांच्यासमवेत सरकारमध्ये होते. तीन-चार वर्षापूर्वी मोदी यांनी काश्मीरच्या विकासाचा चांगला कार्यक्रम मांडल्याने त्याचे स्वागत केले. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची टीका गांभीर्याने घेण्यासारखी नसते.

- Advertisement -

मी सगळं ध्यानात ठेवतो

‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशाच्या हितादृष्टीने घातक असल्याचे सांगत त्यांना हटवण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी घेतला आहे. लोकसभेला ते आघाडीसोबत नाहीत. विधानसभेला त्यांच्याशी चर्चा होऊ शकते, असेही पवार यांनी सांगितले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ या टॅगलाईन खाली शिवसेनेचा प्रचार सुरू केला आहे. त्यावर पेठवडगावच्या सभेत ‘ त्यांचे ठरलंय तर आम्ही पण ध्यानात धरलंय’ असा इशारा पवार यांनी दिला होता. त्याबाबत पुन्हा विचारणा केली असता, ‘मी महाराष्ट्रभर फिरतो त्यामुळे कोण काय काय म्हणतो ते सगळे ध्यानात ठेवतो. त्यामुळे ध्यानात काय ठेवले हे तुम्हाला लवकरच कळेल, असे पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -