घरलोकसभा २०१९तडका वादाचामावळ्यांचे सरकार पाहिजे की मावळला 'गोळीबार' करणाऱ्यांचे - उद्धव ठाकरे

मावळ्यांचे सरकार पाहिजे की मावळला ‘गोळीबार’ करणाऱ्यांचे – उद्धव ठाकरे

Subscribe

मावळ लोकसभा मतदार संघात मावळ्यांचे सरकार हवंय की मावळला गोळीबार करणाऱ्यांचे, असा सवाल शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना करत अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. ते विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार सभेत पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते. यावेळी शिवसेनवचे संजय राऊत,आमदार लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वारसह कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधकांना घरी बसवायचे आहे. सध्या मावळ लोकसभा मतदार संघात काही हजार लोक आले आहेत. परंतु, बारामतीची भानामती इथं चालणार नसल्याचे ते म्हणाले. गेल्यावेळी आपण लोकसभेत, विधानसभेत आणि महानगर पालिकेच्या निवडणुकीत पराभव केलेला आहे. आताच्या लोकसभेत देखील तेच होणार. मावळचा गोळीबार कोणी केला? कोणाचं सरकार होते, पाहिजे का ते सरकार? असं ठाकरे कार्यकर्त्यांना म्हणाले. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. “मावळ्यांचे सरकार पाहिजे की मावळला गोळीबार करणाऱ्यांचे पाहिजे?” असा प्रश्न उपस्थित कार्यकर्त्यांना केला.

- Advertisement -

शिरूर लोकसभा मतदार संघात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे निवडणूक लढवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. ती भूमिका मालिकेपुरती आहे. भगव्याला मत देऊ नका, अजित पवार (धरणाचा विधानाचा दाखल देत) असे उर्मट बोलणाऱ्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज मत द्या सांगू शकतात का? अश्या नालायकांना मत देऊ शकतात का? असे म्हणत शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांचा खरपूस समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -