घरमहाराष्ट्रविवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीचा पतीवर जीवघेणा वार

विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीचा पतीवर जीवघेणा वार

Subscribe

पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीने पतीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना अकोल्यामध्ये घडल्याचे समोर आले आहे.

पतीपत्नी यांच्या नात्यामध्ये विश्वास फार महत्त्वाचा असतो. या विश्वासाची शिदोरी जितकी घट्ट असते, तितकच घट्ट नातही असते. परंतु, या विश्वासाला तडा जातो आणि त्याचे रुपांतर चिखलफेक आरोपांमध्ये आणि चारित्र्य संशयावर होते. अगदी अशीच घटना अकोल्यात घडल्याचे समोर आले आहे. पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीने पतीवर कुऱ्हाडीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पतीने रामदास पेठ पोलीस ठाण्यात पत्नी आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले?

मुलाच्या वाढदिवसानिमित्त पती मंगेश तायडे सासुरवाडीला गेला होता. त्या दरम्यान, पती पत्नीत पुन्हा चारित्र्यावरुन वाद सुरु झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि पत्नीने पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंगेश त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसह अकोल्याच्या उल्हासनगर येथे राहून मोलमजुरी करतो. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचे त्याच्या पत्नीसोबत वाद झाल्याने पत्नी मातानगर येथे माहेरी आली होती. त्यानंतर तो दोन्ही मुलांना घेऊन तिच्या पाठोपाठ आला होता. शुक्रवारी एका मुलाचा वाढदिवस असल्याने तो पत्नीच्या आईकडे आला. त्यानंतर त्यांच्यात वाद झाले म्हणून मंगेश त्याच्या आईकडे निघून गेला. मात्र पत्नीच्या माहेरी असलेली बॅग घेण्यासाठी तो पुन्हा गेला असता त्यावेळी त्याच्यावर हल्ला चढवला. सासू कोकिळा खरात हिने मंगेश याची कॉलर पकडत मुलगी पाठवण्यास नकार देत तुझे दोन्ही मुले घेऊन जा, असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर मंगेश आल्यापावली परतला असता त्याच्या पत्नीने त्याच्या डोक्यावर मागून कुऱ्हाडीने हल्ला आणि या हल्ल्यात मंगेश गंभीर जखमी झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बहिणीची छेड काढणाऱ्यांना विरोध केल्याने भावावर चाकू हल्ला

हेही वाचा – मुलुंड येथे तरुणांवर प्राणघातक हल्ला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -