घरमहाराष्ट्रफेसबुक पोस्टवरुन लातूरमध्ये तरुणाची हत्या

फेसबुक पोस्टवरुन लातूरमध्ये तरुणाची हत्या

Subscribe

फेसबुक पोस्टवरुन लातूरमध्ये एका तरुणाची चाकू खोपसून हत्या करण्यात आली आहे.

फेसबुक पोस्टवरुन तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. लातुरच्या निलंगा तालुक्यातील शिरोळ येथे सोमवारी सकाळी ही घटना घडली. फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवरुन झालेल्या बाचाबाचीत आरोपी सुरेश जाधवने राजेंद्र जाधव यांच्या पाठीवर चाकू खोपसला. त्यांच्यात हाणामारी देखील झाली. चाकू खोपसल्यानंतर राजेंद्र जाधव यांना रुग्णालयात तातडीने उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिरुर अनंतपाळ पोलिसांनी आरोपी सुरेश जाधवला अटक केली आहे. सुरेश स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर राहिला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली.

काय आहे नेमके प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र जाधव आणि फिर्यादी प्रसाद जाधव शिरोळ वांजरवाडातील एका हॉटेल समोर बोलत थांबले होते. यावेळी आरोपी सुरेश जाधव तिथे आला. त्याच्यासोबत गणेश जाधव, संतोष जाधव, विक्रम जाधव, विश्वास जाधव, दिलीप जाधव, भरत जाधव देखील तिथे हजर होते. सुरेशने राजेशला फेसबुक पोस्टसंदर्भात जाब विचारला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी इतर लोकांनी भांडण थांबवण्याऐवजी वाढवले. यात सुरेशने राजेंद्र यांच्यावर चाकून हल्ला केला. त्याने राजेंद्र यांच्या पाठीत चाकू खोपसला. त्यामुळे रुग्णालयात नेत असताना वाटेवर राजेंद्र यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात प्रसाद जाधव यांनी तक्रार दाखल केली. प्रसाद जाधव यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ कलमांनुसार सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गोवंडीत मोबाईलवर व्हिडिओ काढला म्हणून एकाची हत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -