घरमुंबईदुर्घटनेनंतर सेलिब्रिटीनी वाहिली श्रद्धांजली

दुर्घटनेनंतर सेलिब्रिटीनी वाहिली श्रद्धांजली

Subscribe

दि.१४ रोजी सायंकाळी साडे सात वाजता सीएसएमटी रेल्वे बाहेरील दुर्घटनेमध्ये ६ जण मृत तर ३४ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर राजकारणी, सेलिब्रिटी, क्रिकेटर यांनी या दुर्घटने विषयी मृताना श्रद्धांजली वाहिली आहे तर प्रश्नसुद्धा उपस्थित केले आहेत.

छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशन बाहेरील पादचारी पूल कोसळण्याची दुर्घटना दि. १४ रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेमध्ये ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ३४ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना ऐन सांयकाळच्या सुमारास घडली असल्यामुळे तिथे कामावर येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तसेच पूलाखाली वाहानांची सुद्धा वळदळ होती. मुंबईमध्ये अशा पूल दुर्घनेच्या घटना या दिवसेंदिवस वाढत आहेत. निष्कारण सामान्य मुंबईतील नागरिकांचा जीव जात आहे. सीएसएमटी पादचारी पूल कोसळ्याच्या दुर्घटनेनंतर राजकारणी, सेलिब्रिटी, क्रिकेटर यांनी या दुर्घटने विषयीचे दु:ख व्यत केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई सीएसएमटी बाहेरील पुल दुर्घटनेच्या जीवितहानी मुळे मी तीव्र खेद व्यक्त करतो. माझ्या दुष्टीसमोर शोकग्रस्त कुटुंबीय आहेत. तसेत जे जमखी आहेत ते लवकरात लवकर बरे होतील अशी प्रार्थना करतो. महाराष्ट्र सरकार या दुर्घटनेतील पीडितांना शक्य तेवढी मदत पुरवत आहोत.

- Advertisement -

Deeply anguished by the loss of lives due to the foot overbridge accident in Mumbai. My thoughts are with the bereaved families. Wishing that the injured recover at the earliest. The Maharashtra Government is providing all possible assistance to those affected.

— Narendra Modi (@narendramodi) March 14, 2019

- Advertisement -

अभिनेता रीतेश देशमुख

ही खूप दु:खत गोष्ट घटना घडली. या दुर्घटनेमध्ये कित्येकांनी जीवसुद्धा गमावले आहे. ज्या कुटुंबीयानी आपल्या प्रियजनांना गमावले आणि अनेक जण जखमी झाले, आपल्या जीवा वाचवनासाठी लढा देत आहेत. या नागरिकांसाठी माझ्या प्रति सहानभुती आहे. अशा प्रकारची हलगर्जीपणा अयोग्य आहे.

What a horrible tragedy.. so sad to know that many have lost lives. My deepest condolences to the families who lost their loved ones & prayers for the injured. This #MumbaiBridgeCollapse should have been avoided. This negligence is unpardonable.

— Riteish Deshmukh (@Riteishd) March 14, 2019

सचिन तेंडुलकर

सीएसएमटी रेल्वे स्टेशन बाहेरील पुल कोसळलेली दुर्घटना खूप दु:खत आहे. या दुर्घटनेत जे जखमी झाले त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे आवश्यक आहेत आणि यानंतर अशा घटना टाळण्यासाठी अधिकारी कार्य करतील अशी अपेक्षा करतो.

Distressed at the news of the fall of part of the overbridge at CST. Praying for the injured.

Commuter safety needs attention and hoping that authorities act to prevent such incidents.

— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 14, 2019

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

मुबंई सीएसएमटी पादचारी पुलावर झालेल्या दुर्घटना ऐकून खूप दु:ख झाले. या दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या प्रति सहानुभूती व्यक्त करतो. तसेच या दुर्घटनेत जखमी झाले ते लवकरात लवकर बरे होवोत अशी प्रार्थना करतो.

मुंबई फुटओवर ब्रिज हादसे की ख़बर से मुझे बेहद दुःख हुआ है।

मृतकों के परिजनों के प्रति मैं अपनी गहरी शोक और संवेदना व्यक्त करता हूँ।

जो घायल हैं उन्हें जल्द से जल्द राहत मिले मेरी ये प्रार्थना है।

— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 14, 2019

चित्रा किशोर वाघ

एलफिंस्टन पूल दुर्घटेनंतर सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक पूलांची दुरुस्ती करणार असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी जाहिर करुनही ऑडीट केलं नाही. सरकारच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप मुंबईतील नागरिकांचे बळी गेले याला जबाबदार कोण?

छगन भूजबळ

सीएसएमटी बाहेरील पादचारी पूलाची दुर्घटना अगदिच दुर्दैवी घटना घडली आहे.  सध्या सत्तेत असलेल्या युती सररकारच्या ढिसाळ कारभाराचा जाहीर निषेध केला आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सजवळील पादचारी पूल कोसळण्याची घटना अत्यंत दुर्देवी

युती सरकारच्या ढिसाळ कारभाराचा जाहीर निषेध#MumbaiBridgeCollapse pic.twitter.com/dUF9114SIY

— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) March 14, 2019

सुप्रिया सुळे

सीएसएमटी परिसरातील पूल कोसळून दुर्घटना घटली. ही दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेमध्ये दगावलांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुंबई येथे सीएसटीजवळचा पुल कोसळून अपघात झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेत दगावलेल्यांना श्रद्धांजली.

— Supriya Sule (@supriya_sule) March 14, 2019

अजित पवार

सीएसएमटी परिसरात पादचारी पूल कोसळल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत सामान्य नागरिक मृत्यू पावले हे खूप दु:खत आहेत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल, अशी प्रार्थना सुद्धा केली आहे. पुलाच्या दर्जा आणि त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित केला आहे.

सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात पादचारी पूल कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचं वृत्त अतिशय दुःखद आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, अशी प्रार्थना करतो. या दुर्घटनेमुळे मुंबईतील पुलांचा दर्जा आणि त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित होत आहे.

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 14, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -