घरमुंबईभिवंडीतील १२ वर्षाचा शाळकरी मुलगा घरातून बेपत्ता

भिवंडीतील १२ वर्षाचा शाळकरी मुलगा घरातून बेपत्ता

Subscribe

भिवंडीतून एका १२ वर्षाचा मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांकडून शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

भिवंडी शहरात १२ वर्षीय शाळकरी मुलगा अचानक घरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील कामतघर, गणेशनगर येथे घडली असल्याचे समोर आले आहे. अभिषेक रामाश्रेय यादव (१२) असे बेपत्ता झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.

भिवंडीतील गणेशनगर याठिकाणी राहत्या घरातून अभिषेक यादव अचानक बेपत्ता झाला आहे. तो सहावीच्या वर्गात शिकत असल्याची माहिती मिळाली आहे. अचानक अभिषेक राहत्या घरातून निघून गेल्याने त्याच्या आईवडिलांनी अभिषेकचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे अभिषेकच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून शोध सुरु असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पवार यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -