घरमुंबई१ हजार ४५९घरांमध्ये केडीएमसीचे सर्वेक्षण

१ हजार ४५९घरांमध्ये केडीएमसीचे सर्वेक्षण

Subscribe

मेंदुज्वराने दोन चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर पालिकेला जाग

मेंदुज्वराने दोन चिमुकल्यांचा जीव गेल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेचा वैद्यकिय विभाग खडबडून जागा झाला आहे. पालिकेच्या वैद्यकिय विभागाकडून ही बालके राहत असलेल्या परिसरातील तब्बल 1 हजार 459 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच 261 कंटेनर तपासणी करण्यात आले असून 13 कंटेनर दूषित आढळून आले आहेत.

कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरात राहणारा 7 वर्षीय श्लोक मल्ला आणि गणेशवाडी परिसरात रहाणारी 4 वर्षीय तनुजा सावंत या दोन चिमुरड्यांचा मेंदुज्वराच्या आजाराने मृत्यू झाल्याची ह्यदयद्रावक घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती.

- Advertisement -

राज्याच्या वैद्यकिय पथकानेही या परिसरात येऊन पाहणी केली. गेल्या चार दिवसांपासून पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाने वाडेघरआणि गणेशवाडी परिसरातील घरांचे सर्वेक्षण करीत तिथल्या लहान मुलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. हे रक्तनमुने पुण्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. लहान मुलांना ताप अथवा उलटी, मळमळ किंवा झटके येणे अशी कोणतेही लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या महापालिका रुग्णालयात संपर्क साधावा व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्ताची चाचणी करून घ्यावी, तसेच घर व घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -