घरमुंबईArticle 370 : काश्मीरमधून कलम हटवून काय केले?; संजय राऊत यांचा भाजपला...

Article 370 : काश्मीरमधून कलम हटवून काय केले?; संजय राऊत यांचा भाजपला सवाल

Subscribe

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवून एक वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र तरीही या मुद्द्यावरून आजही राजकारण पेटलेले पाहायला मिळते. काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतरही श्रीनगरमध्ये काही तरुणांना तिरंगा फडकावण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी काश्मीर नेत्यांवर टीका केली आहे. तरुणांना श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावू न देणे हा भारताच्या संविधानाचा सगळ्यात मोठा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजपा सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवून काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले संजय राऊत 

चार दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात भारतीय जनता पार्टीचे चार कार्यकर्ते तिथे तिरंगा फडकवायला गेले होते. त्यांना पोलिसांनी पकडून पुन्हा पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यांना तिरंगा फडकावण्यापासून रोखण्यात आले. श्रीनगर, काश्मीर भारताचे अविभाज्य अंग असल्याचे आपण नेहमीच सांगतो. ३७० कलम आता हटवण्यात आले आहे. तरीसुद्धा आम्ही आमच्या लोकांना तिकडे तिरंगा फडकावण्यापासून रोखत असू, तर काश्मीरमध्ये काय बदल झाला आहे हा लोकांच्या मनात प्रश्न आहे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले की, मेहबुबा मुफ्तीच कशाला फारुख अब्दुल्लाही बोलले होते, कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी आम्ही चीनची मदत घेऊ, चीनच्या मदतीने त्यांना ३७० पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये लागू करायचे आहे. तर केंद्राने कठोर पावले उचलायला हवीत. मेहबुबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला हे दोन्ही काश्मीरमधले नेते ज्या पद्धतीने तिरंग्याबाबत बोलतात हा तिरंग्याचा अपमान आहे. हा देशाच्या घटनेचा अपमान आहे. हा घटनेच्या स्वातंत्र्याचा अपमान असल्याचेही संजय राऊत यांनी अधोरेखित केले आहे. जोपर्यंत काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम लागू होत नाही, तोपर्यंत तिरंगा फडकावणार नाही, असे सांगणे हा १३० कोटी जनतेचा अपमान आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबईकरांना मिळणार दिलासा; येत्या काही दिवसात सर्वांसाठी धावणार ट्रेन!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -