‘सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा ऐतिहासिक असून सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्या वादावर आता पडदा पडला आहे.’ अशा स्पष्ट शब्दात पक्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी मांडली आहे. अयोध्या प्रकरणाचा आज सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केला आहे त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी आपलं मत आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
हमारी भूमिका शुरू से रही है के सुप्रीम कोर्ट का जो फैसला हो गा हम मानें गे और सब मानें ,
आशा है देश में और कोई नया विवाद धर्म के नाम पर पैदा नही होगा ,@MumbaiNCP @MumbaiNCP@ANI @PTI_News— Nawab Malik (@nawabmalikncp) November 9, 2019
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करत ‘सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल असेल तो आम्हाला मान्य असेल आणि सर्वांनी मान्य करावा अशी आमची सुरुवातीपासूनच भूमिका राहिली आहे. देशात धर्माच्या नावावरून आणखी कोणता नवीन वाद निर्माण होणार नाही अशी आशा आहे.’, असे म्हटले आहे.
धर्माच्या नावाने असा वाद पुन्हा होणार नाही
‘सुप्रीम कोर्टाचा जो निकाल येईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. मग राजकीय पक्ष असो किंवा धार्मिक संघटना, सर्वांनीच तो मान्य केला पाहिजे, अशी आमची सुरुवातीपासूनच भूमिका होती,’असेही नवाब मलिक म्हणाले. ‘कुठेही उत्सव साजरा करु नये. कुणाच्या भावना दुखावल्या जावू नये, ही भावना लोकांनी स्वीकारली पाहिजे. यापुढे कुठल्याही राजकीय पक्षांच्या माध्यमातून धर्माच्या नावाने असा वाद पुन्हा होणार नाही, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.