घरमुंबईपालघरमध्ये 'बविआ'ची 'शिट्टी' वाजणार नाही

पालघरमध्ये ‘बविआ’ची ‘शिट्टी’ वाजणार नाही

Subscribe

पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला (बविआ) जबरदस्त झटका बसल आहे. निवडणुक आयोगाने त्यांचं 'शिट्टी' हे निवडणुक चिन्हंच गोठवलंय.

पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला (बविआ) जबरदस्त झटका बसल आहे. निवडणुक आयोगाने त्यांचं ‘शिट्टी’ हे निवडणुक चिन्हंच गोठवलंय. त्यांना आता रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे त्याचा सर्वात मोठा फायदा थेट शिवसेनेला मिळणार आहे. पालघर लोकसभा मतदार संघात शिवसेना विरुद्ध बहुजन विकास आघाडी असाच थेट सामना होत आहे. मात्र मतदानापूर्वीच बहुजन विकास आघाडीचं ओळख असलेलं ‘शिट्टी’ हे निवडणुक चिन्हं निवडणुक आयोगाने गोठवलंय.

हे चिन्हं कोणालाच न देण्याचा निर्णय जाहीर

पालघरमध्ये बहुजन महापार्टीच्या उमेदवारानेही शिट्टी या निवडणुक चिन्हासाठी आग्रह धरला होता. मात्र या संदर्भातला वाद चिघळल्यावर बविआने मुंबई हायकोर्टात दाद मागितली. मुंबई हायकोर्टाने वाद निवडणूक आयोगाकडेच सोपवला आणि निर्णय घेण्याचा अधिकार दिला. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाचंही दार ठोठवण्यात आलं. आज, शनिवारी पहाटे पालघर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ‘शिट्टी’ हे निवडणूक चिन्हं कोणालाच न देण्याचा निर्णय जाहीर केला. याचा सर्वात मोठा फटका थेट बविआ बसणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णय प्रक्रियेत दगा फटका होऊ नये यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी रात्रभर तळ ठोकला होता. मात्र अखेर बविआची ‘शिट्टी’ काही वाजलीच नाही. त्यामुळे त्यांना आता मतदारांकडे नवीन निवडणूक चिन्ह पोहचवण्याची कसरत करावी लागणार आहे.

- Advertisement -

जाधव – गावित यांच्यात लढत 

पालघर मतदार संघातून बविआने बळीराम जाधव यांना उमेदवारी दिली असून युतीच्यावतीने भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजेंद्र गावित हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. या जागेवरून माजी दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे सुपूत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी राजेंद्र गावित यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता बविआचे बळीराम जाधव आणि सेनेचे राजेंद्र गावित यांच्या लढत होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -