घरमुंबईमनसेचे इंजिन दोन्ही काँग्रेससोबत विधानसभेच्या निवडणुुकीत धावणार

मनसेचे इंजिन दोन्ही काँग्रेससोबत विधानसभेच्या निवडणुुकीत धावणार

Subscribe

लोकसभा निवडणूक लढण्यास अनुत्सुक

मागी ल वर्षभरापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. त्यामुळे मनसे लोकसभा निवडणूूक लढणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या महाआघाडीत जाण्यासाठी मनसे जोरदार प्रयत्न करत असल्याचेही दिसत होते. मात्र आता मनसेची भूमिका सुस्पष्ट झाली असून लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा द्यायचा मात्र निवडणूक लढवायची नाही, परंतु विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या महाआघाडीत प्रवेश करून रितसर विधानसभा लढवायची, अशी रणनीती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आखली असल्याचे सूत्रांकडून समजते. यासंदर्भात राज ठाकरे शनिवारी होणार्‍या मनसेच्या मेळाव्यात स्पष्टपणे बोलणार आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात याबाबत सविस्तर बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसे मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करून अर्थात भाजप-सेनेच्या विरोधात प्रचार करील, मात्र त्यानंतर विधानसभेत मैदानात उतरेल, अशी भूमिका राज ठाकरे यांनी या बैठकीत मांडली. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी शरद पवार यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र मनसेला महाआघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध होता. तरीही राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील कल्याणची जागा मनसेला सोडण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेसलादेखील गळ घातली होती. मात्र आता मनसे लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सूक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे पुण्यातील एका कार्यक्रमात एकत्र होते. त्यावेळी राज यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर या दोन नेत्यांमधील जवळीक कायम चर्चेत राहिली. यानंतर मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार प्रयत्न सुरू केले. मात्र काँग्रेसने मनसेला सोबत घेण्यास कायम विरोध दर्शवला. महाराष्ट्रात मनसेला सोबत घेतल्यास त्याचा सर्वाधिक फटका उत्तर प्रदेशात बसेल, अशी भीती पक्षाच्या नेत्यांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली. मनसेची उत्तर भारतीयांच्या विरोधातली भूमिका पक्षासाठी अडचणीची ठरू शकते. काँग्रेसला होणारे उत्तर भारतीय मतदान कमी होऊ शकते, अशी भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या हायकमांडकडे मांडली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -