घरमुंबईजागतिक शांततेसाठी बुद्धविचारांची गरज - राज्यपाल विद्यासागर राव

जागतिक शांततेसाठी बुद्धविचारांची गरज – राज्यपाल विद्यासागर राव

Subscribe

बौद्ध धर्म हा भारताच्या महान आध्यात्मिक परंपरांचा प्रसारक आहे. आजची जागतिक परिस्थिती पाहता जगाला बुद्धविचारांची आवश्यकता असल्याचे मत राज्यपाल विद्यासागर राव यांने एका कार्यक्रमात व्यक्त केले आहे.

शांतता, सौहार्द, ज्ञान आणि करुणा या तत्त्वज्ञानाचा आधार असलेला बौद्ध धर्म हा भारताच्या महान आध्यात्मिक परंपरांचा प्रसारक आहे. आजची जागतिक परिस्थिती पाहता जगाला बुद्धविचारांची आवश्यकता आहे, असे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केले. के. जे. सोमय्या सेंटर फॉर बुद्धीजम स्टडीजच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘एम्बडींग कंम्पॅशन : अवलोकितेस्वरा इन बुद्धिस्ट आर्ट’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सोमय्या विद्याविहारने चीनमधील हँगझोऊ बुद्धिस्ट ॲकॅडमीच्या सहकार्यातून या परिषदेचे आयोजन केले आहे. याप्रसंगी सोमय्या विद्याविहारचे अध्यक्ष समीर सोमय्या, हँगझोऊ बुद्धिस्ट ॲकॅडमीचे सहाय्यक रेक्टर प्रा. हुआँग झेंग, सोमय्या विद्याविहार ट्रस्टच्या विश्वस्त लीलाबेन कोटक आदि उपस्थित होते.

भारत म्हणजे तत्त्वज्ञानाचे भांडार

प्राचीन काळापासून भारताला जगातील एक महान संस्कृतींमध्ये मानले जाते, असे सांगून भारत म्हणजे इतिहास, संस्कृती, विश्वास आणि तत्त्वज्ञानाचे भांडार आहे. ‘द केस फॉर इंडिया’ या पुस्तकात अमेरिकेतील तत्त्वज्ञ आणि इतिहासतज्ज्ञ विल ड्यूरंट यांनी भारताला अमेरिकेचे वांशिक मातृत्व, संस्कृतला युरोपच्या भाषांची जननी, गणित, अमेरिकन तत्वज्ञान, बुद्ध तत्वज्ञानाला ख्रिस्त धर्मातील तत्वज्ञानाचा आधार, ग्राम स्वराज्य आणि लोकशाहीची जननी असल्याचे नमूद केले आहे.
भारतीय संस्कृतींनी नेहमी विविध विचार, विश्वास, नवीन कल्पनांचे स्वागत केले आहे. भारताची भूमी बौद्ध, जैन आणि शिख धर्म आणि इतर अनेक पंथ तसेच विश्वास यांचे जन्मस्थळ बनली. भारताने मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, पारशी आणि इतर धर्मांचेच नव्हे तर नास्तिक विचारांचेही स्वागत केले. भारतातून आशियासह इतर देशांमध्ये बौद्ध भिक्खू तसेच व्यापारी येथील ज्ञान आणि शिकवणच नव्हे तर कला, शिल्पकला, ध्यान पद्धती, भाषा आणि मार्शल आर्ट चे ज्ञान देखील बरोबर घेऊन गेले. भारतामधील ‘विपश्यना’ ही जगभरातील सर्वात लोकप्रिय ध्यान पद्धतींपैकी एक बनली आहे.

- Advertisement -

संस्थेने स्थापन केलेल्या बौद्ध धम्माचे अभ्यासकेंद्र, जैन धर्माचे अभ्यासकेंद्र तसेच भारतीय संस्कृती अभ्यास केंद्राला अनेक नामांकित संस्थांनी मान्यता दिली आहे. के. जे. सोमय्या सेंटर फॉर बुद्धीस्ट स्टडीजला प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाचे स्थायी केंद्र म्हणून मुंबई विद्यापीठाने मान्यता दिली आहे. याशिवाय तत्त्वज्ञान, पाली आणि संस्कृत च्या अभ्यासासाठीही या केंद्राला मान्यता दिली आहे. विद्याविहारच्या भारतीय संस्कृती पीठाला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ तसेच मुंबई विद्यापीठाने उच्च अभ्यासाक्रमांसाठी मान्यता दिली आहे. विद्याविहारकडून भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातात. – सोमय्या, सोमय्या विद्याविहारचे अध्यक्ष


वाचा – चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी केले राज्यपालांच्या पुस्तकाचे प्रकाशन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -