सीएसएमटी रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू तर ३५ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली. अतिशय दुर्दैवी घटना असून या दुर्घटनेप्रकरण उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. दरम्यान, जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच मृतांच्या कुटुंबियांनी ५० लाख आणि जखमींना ५० हजाराची मदत सरकारने जाहीर केली आहे.
Maharashtra CM: It's unfortunate. I've ordered for a high level inquiry. A structural audit of the bridge had earlier been done&it was found to be fit. Even after that if such incident happened, it raises question on the audit. Inquiry will be done. Strictest action will be taken pic.twitter.com/h7qHQXKWqb
— ANI (@ANI) March 14, 2019
पुलाच्या स्ट्रक्चर ऑडीटवर प्रश्नचिन्ह
या पादचारी पुलाचे काही दिवसांपूर्वी स्ट्रक्चर ऑडीट करण्यात आले होते. या मात्र त्यामध्ये पुल मजबूत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे स्ट्रक्टर ऑडीटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, या पुलामध्ये काही दुरुस्ती सांगण्यात आल्या होत्या त्याचे काम कुठ पर्यंत आले होते. याचा देखील तपास केला जाणार आहे. या तपासामध्ये कोणी दोषी आढळले तर त्यांच्याविरोध कडक कारवाई करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Maharashtra CM Devendra Fadnavis: Ex-gratia of Rs 5 Lakh each will be given to the families of those who died in the incident and compensation of Rs 50,000 each will be given to the injured, state govt will provide for their treatment. https://t.co/oJZV1g8Uhg
— ANI (@ANI) March 14, 2019
मृतांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत
सीएसएमटी दुर्घटनेत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर ३५ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना सरकारने ५० लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जे जखमी झाले आहेत त्यांना ५० हजारांची मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसंच जखमींवर सर्व उपचार शासनामार्फत केले जाणार आहेत. प्राथमिक रिपोर्ट लवकरच हाती येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Deeply anguished by the loss of lives due to the foot overbridge accident in Mumbai. My thoughts are with the bereaved families. Wishing that the injured recover at the earliest. The Maharashtra Government is providing all possible assistance to those affected.
— Narendra Modi (@narendramodi) March 14, 2019
जखमींची प्रकृतीत सुधारणा व्हावी
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे ‘ही घटना समजल्यानंतर खूप दु:ख झाले. या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. तसंच जे जखमी झाले आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो. महाराष्ट्र सरकारने जखमींना ताबडतोब शक्य तितकी मदत पुरवावी.’