घरCORONA UPDATEसरकारला अॅक्शन पॅरेलेसिस झालाय - देवेंद्र फडणवीस

सरकारला अॅक्शन पॅरेलेसिस झालाय – देवेंद्र फडणवीस

Subscribe

‘तीन पक्षांच्या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तीन पक्षांचा एकमेकांमध्ये समन्वय नाही. तसेच या तीन पक्षांचा अधिकाऱ्यांशीही समन्वय नाही. त्यामुळे ठाकरे सरकारला पॉलिसी पॅरेलेसिस तर झाला आहेच, पण या सरकारला अॅक्शन पॅरेलेसिसही झाला’, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच शिवसेना केंद्र सरकारवर करत असलेल्या टीकेला अर्थ नाही, तत्त्व नाही आणि मूल्यही नाही, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

दरम्यान केंद्राने घाईनेच लॉकडाऊन केला अशी टीका शिवसेनेकडून होते. मात्र शिवसेनेच्या टीकेला अर्थ नसल्याची टीका देखील फडणवीस यांनी यावेळी केली. देशाच्या आधी लॉकडाउन पुकारला तो महाराष्ट्राने. मग लॉकडाउनची घाई कुणी केली? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. देश आम्हाला फॉलो करतो आहे, अशा जाहिराती तेव्हा केल्या आणि आता यांना त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे केंद्राने लॉकडाउन करताना घाई केली अशी ओरड केली जात असल्याची टीका देखील त्यांनी केली.

- Advertisement -

एवढेच नाही तर शिवसेना भाजपसोबत पाच वर्षे सत्तेत होती. मात्र तेव्हाही त्यांनी विरोधी पक्षाचेच काम केल्याची टीका देखील त्यांनी केली. तसेच शिवसेना एका भूमिकेवर ठाम राहिली असती तर तर ठीक होते पण रोज भूमिका बदलयाची हे त्यांचे धोरण असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. त्यामुळेच एक दिवस म्हणायचं पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलं काम करत आहेत. काही दिवसांनी मोदींवर टीका करायची. एकदा राज्यपालांना नावं ठेवायची, नंतर कुर्निसात करायचा. फक्त टीकेसाठी टीका करायची असे शिवसेनेचे धोरण असल्याचे म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली.

रायगडला दिलेली मदत तोकडी

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल असे सांगत या चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना राज्य सरकारने मोठी मदत करावी. तातडीने रोख रक्कम नागरिकांना मिळाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. एवढेच नाही तर राज्यात भाजपाचे सरकार असताना अशा आपत्तीच्या प्रसंगात कसे निर्णय घेण्यात आले. नागरिकांना कशी जास्तीत जास्त मदत उपलब्ध करुन दिली त्याची उदहारणं देखील फडणवीस यांनी यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात करोनाची स्थिती वाईट होत चालली आहे असे म्हणत जेवढ्या चाचण्या व्हायला हव्यात तेवढ्या होत नसल्याचे सांगत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड ताब्यात घेतले आहेत याही फक्त घोषणा असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. तसेच श्रमिक जेव्हा ट्रेन सुरु केल्या गेल्या नव्हत्या आणि पायी चालले होते तेव्हा आपल्या डोक्यावरचं संकट टळलं हे या सरकारचं धोरण होतं. श्रमिकांची काळजी त्यावेळी घेतली गेली नाही. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीतही मी त्यांना सल्ला दिला होता की जे पायी जाणारे श्रमिक आहेत त्यांना थांबवा, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -