घरताज्या घडामोडी'नया है वह', म्हणत फडणवीसांनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली!

‘नया है वह’, म्हणत फडणवीसांनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली!

Subscribe

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या टिकेला माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खोचक टीका करून उत्तर दिलं असून त्यांच्या टिकेची खिल्ली उडवली आहे. देवेंद्र फडणवीसांनी राज्यभरातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काढलेल्या दौऱ्यातून सरकारवर कोरोनाची खरी माहिती लपवल्याचे आरोप केले होते. तसेच, राज्यातल्या काही प्रमुख ठिकाणी भेटी देऊन तिथे कोरोनावर उपाययोजनांमध्ये सरकार कसं कमी पडत आहे, याचे दाखले पत्रकार परिषदा घेऊन दिले होते. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) त्यांच्यावर निशाणा साधला होता.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले होते, ‘कोरोनाच्या या संकटकाळात लोकांना मदत करण्याऐवजी विरोधी पक्षातली मंडळी राज्यभर फिरत आहेत आणि सरकारवर टीका करत आहेत. आपत्ती पर्यटन अर्थात डिझास्टर टुरिझम करत आहेत’.

- Advertisement -

‘त्यांच्या टीकेवर मला प्रतिक्रियाही द्यायची नाही’

दरम्यान, या टिकेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांना आज पत्रकारांनी विचारणा केली असता फडणवीसांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेची खिल्ली उडवली. ‘नया है वह. (Naya Hai Waha) मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात, त्यांना मंत्री बनवता येतं. पण मंत्री बनले, म्हणजे शहाणपणा येतोच असं नाही. माझ्यासारख्या माणसानं त्यांच्या या टिकेवर फार काही प्रतिक्रियाही देऊ नये’, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

संजय राऊतांवरही साधला निशाणा

यावेळी बोलताना फडणवीसांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) देखील निशाणा साधला आहे. ‘रोज रोज सरकार पाडू असं न म्हणता त्यांनी सरकार पाडून दाखवावं आणि मग बोलावं’, असं आव्हान संजय राऊतांनी भाजपला केलं आहे. ‘विरोधक सत्ता पाडण्यासाठीचे मुहूर्त शोधत आहेत’, असं देखील ते म्हणाले होते. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ‘हे म्हणजे आपणच मारल्यासारखं करायचं आणि आपणच रडल्यासारखं करायचं. फक्त म्हणायचं सरकार पाडतायत सरकार पाडतायत. कुणीही सरकार पाडण्याचा प्रयत्न करत नाहीये’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -