घरमुंबई'आगी लागून निष्पाप लोकांचा बळी जाण्याचे दुष्चक्र कधी थांबणार'

‘आगी लागून निष्पाप लोकांचा बळी जाण्याचे दुष्चक्र कधी थांबणार’

Subscribe

पूल कोसळण्याचे आणि आगी लागून निष्पाप लोकांचा बळी जाण्याचे दुष्चक्र कधी थांबणार? असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

‘मुंबई येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग लागण्याच्या घटनेतून पुन्हा एकदा सर्वसामान्य मुंबईकरांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०१८ मध्ये या इमारतीचे फायर ऑडिट झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, असे असेल तर मग आग विझवताना आणि लोकांची सुटका करताना अग्नीशमन दलाला अनेक अडचणी का आल्या, हे स्पष्ट झाले पाहिजे. या इमारतीच्या लहान खिडक्या आणि बंदिस्त रचनेमुळे अग्नीशमन दलाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली’, असे वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांवरून दिसून येते. ही बाब अतिशय गंभीर आणि दखल घेण्याजोगी असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

आगी लागण्याच्या घटना कमी थांबणार

‘मुंबईत इमारती अन् पूल कोसळण्याचे आणि आगी लागून निष्पाप लोकांचा बळी जाण्याचे दुष्चक्र कधी थांबणार? हा प्रश्न या आगीच्या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. इमारतींचे फायर ऑडिट असो वा जुन्या इमारतींचे स्ट्रकचरल ऑडिट असो, त्यात मोठी हयगय आणि भ्रष्टाचार होत असल्याचे अनेक घटनांमधून वारंवार दिसून आले आहे. मुंबई महापालिकेने ही जबाबदारी स्वीकारून आपल्या अपयशाची कबुली दिणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली आहे.

- Advertisement -

वांद्रेच्या एमटीएनएल इमारतीला आग

वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला लागल्याची घटना घडलीवांद्रे पश्चिमेकडील एस व्ही रोडवरील एमटीएनएल इमारतीला आग लागल्याची घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होतेआगीच्या घटनास्थळी १४ गाड्या दाखल होत अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवत अडकलेल्या १०० जणांनाची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.


हेही वाचा – वांद्रे येथील MTNL च्या इमारतीला आग; ८४ जणांची सुखरुप सुटका

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -