घरमुंबईरेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर

रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर

Subscribe

राजधानी आठवड्यातून चार वेळा धावणार!

मध्य रेल्वे मार्गावरून दिल्लीला जाणार्‍या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावरुन दिल्ली-मुंबई अशी धावणारी राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून दोनदा नाही, तर तब्बल चार वेळा चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेणार आहे. पूर्वी ही गाडी आठवड्यातून दोनदाच धावत असल्यामुळे मुंबई, नाशिककडून नवी दिल्लीला जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेत ही एक्सप्रेस आता आठवड्यातून चार वेळा चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

मध्य रेल्वे मार्गावर तब्बल 27 वर्षांनी मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस जानेवारीपासून सुरु झाली. तेव्हापासून ते आतापर्यत मुंबईतीलच नव्हेतर नाशिक, जळगाव आणि भोपाळमधील प्रवाशांची चांगलीच सोय झाली होती. मात्र या एक्सप्रेसच्या फेर्‍या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. मात्र मध्य रेल्वेकडे एक गाडी असल्यामुळे एक्सप्रेसच्या फेर्‍या वाढविता येत नव्हत्या. एकाच गाडीद्वारे आठवड्यात फक्त दोन सेवा शक्य होत होत्या. मात्र आता प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन डब्ल्यूआरकडून अजून एक गाडी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे पुढल्या 15 दिवसांत आणखी राजधानी एक्सप्रेसच्या मुंबई-दिल्ली अशा दोन फेर्‍या सुरु होणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावर धावणार्‍या दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसमुळे मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, बदलापूर, कर्जत, कसारा, पनवेल मार्गावरील प्रवाशांची पश्चिम रेल्वेपर्यंत जाण्याची तारांबळ कमी होणार आहे. तसेच नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यातून ही राजधानी मार्गस्थ होत असल्याने येथील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी जानेवारीमध्ये हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर मध्य रेल्वेवरुन तब्बल 27 वर्षांनंतर पहिली राजधानी एक्स्प्रेस दिल्लीकडे रवाना झाली होती.

- Advertisement -

दुसर्‍या राजधानीला पुश पुल
आगामी एक-दोन दिवसात आम्हाला अजून एक रेक मिळेल. त्यानंतर आम्ही राजधानी एक्सप्रेसच्या फेर्‍या वाढवू. आमच्या पहिल्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये पुश-पुल तंत्रज्ञानाच्या वापर केला होता.त्यामुळे राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढला होता. ही दुसरी गाडी येताच आम्ही या गाडीलासुध्दा पुश-पुल इंजिन लावणार आहोत. ही प्रक्रीया पूर्ण होण्यासाठी सुमारे एक आठवडा लागेल असे रेल्वेचा वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. यासोबतच राजधानी गाडीचा वेग कर्जत, कसारा घाटमाथ्यातून जातानाही कायम किंवा त्यापेक्षा जास्त राहावा यासाठी दोन्ही बाजूला इंजिन जोडण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -