लोकसभा निवडणुक २०१९ मध्ये बहुचर्चित ठरलेली उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर विरुद्ध भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांची मतांची शर्यत अखेरीस संपुष्टात आली आहे. या चढाओढीच्या स्पर्धेत उर्मिला मातोंडकर यांचा तब्बल साडे तीन लाख मतांच्या फरकाने पराभव झालेला आहे तर गोपाळ शेट्टी यांच्या गळ्यात २०१४ प्रमाणेच पुन्हा एकदा विजयी माळ पडल्याचे समोर येत आहे.
- नगरसेवक, आमदार आणि खासदार अशी पदे भूषवली
- विद्यमान खासदार आणि लोकांशी दांडगा जनसंपर्क
- भाजप कार्यकते पदाधिकाऱ्यांसह सोसायटी पातळीवर अध्यक्ष,सेक्रेटरी यांची स्वतंत्र टीम
- विभागातील समाजकार्याची चांगली जाण, आणि मतदारांवर पकड
- जनतेच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी प्रयत्नशीर, आतापर्यंत केलेली अनेक समाज प्रयोगी कामे