घरमुंबईचिंताजनक! मुंबईतला 'मराठी' माणूस हरवतोय

चिंताजनक! मुंबईतला ‘मराठी’ माणूस हरवतोय

Subscribe

व्यावसायिक बदलांमुळे तसंच नोकरीसाठी स्थलांतरित झालेल्या इतर भाषिक लोकांमुळे मुंबईतील 'मराठी'चा टक्का घसरत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

मराठी भाषा आणि मराठी लोकं ही मुंबईची मुख्य ओळख आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आज सर्व जाती-धर्माचे, पंथाचे, विविध भाषिक लोक एकत्र राहत असले, तरी ‘मराठी माणूस’ हीच मुंबईची खरी आणि जुनी ओळख आहे, हे नाकारुन चालणार नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत मुंबईत झपाट्याने होत असलेल्या व्यावसायिक बदलांमुळे तसंच नोकरीसाठी स्थलांतरित झालेल्या इतर भाषिक लोकांमुळे मुंबईतील ‘मराठी’चा टक्का घसरत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. मराठी मुंबईचा हळूहळू हिंदी भाषिकांचे शहर बनण्याच्या दिशेने प्रवास सुरु असल्याचं चित्र दिसत आहे.

मातृभाषेसंदर्भातल्या २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार, मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या २००१ साली २५.८८ लाख होती. २०११ मध्ये हेच प्रमाण ३५.९८ लाख इकते झाले. तर दुसरीकडे त्याचवेळी मराठी मातृभाषिकांच्या संख्येत २.६४ टक्क्यांनी घट झाली. २००१ साली ४५.२३ लाख लोकांनी त्यांची मातृभाषा  मराठी असल्याचे सांगितले होते. मात्र, १० वर्षांनी म्हणजेच २०११ साली हे प्रमाण ४४.०४ लाख झाले.

- Advertisement -

ठाणे – रायगडमध्येही हीच स्थिती

मुंबईलगत असलेल्या ठाणे आणि रायगडमध्येही हिंदी भाषिकांच्या संख्येत तब्बल ८० टक्के वाढ झाली आहे. या भागातील बदलत्या लोकसंख्येमुळे सरकारच्या फक्त नियोजन आणि धोरणांमध्येच बदल होत नाहीये, तर येथे नवीन राजकारणही आकाराला येत आहे. स्थानिक विरुद्ध परप्रांतीय हा संघर्ष मुंबईने अनेकदा अनुभवला आहे. २००९ विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला याच मुद्दाचा फायदा झाला होता. या मुद्द्याच्या आधारे मनसेचे १३ आमदर त्यावेळी एकसाथ निवडणून आले होते.

स्थलांतराचा परिणाम…

मुंबईत कपडा मिल सुरु झाल्यानंतर कोकण, पश्चिम महाराष्ट्रातून मोठया प्रमाणावर नागरिक मुंबईत स्थायिक झाले. त्यानंतर गेल्या ४० वर्षात उत्पादन केंद्रांपासून – सेवा उद्योगांध्ये जसजसा बदल होत गेलास त्यानुसार स्थलांतरचा पॅटर्नही बदलला. आधी मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या अन्य भागातून नागरिक येऊन स्थायिक झाले. त्यावेळी राज्यातील बहुसंख्य लोक हे मराठी भाषिकच होते. मात्र, मिलमधील नोकऱ्यांसाठी कामगारांची गरज भासू लागल्यावर उत्तर प्रदेश, बिहारमधून अन्य भाषिकांचे येथे स्थलांतर वाढले. मात्र, कालांतराने मिलमधील नोकऱ्या कमी झाल्यावर मुंबईत अत्यंत स्वस्तात हा कामगार उपलब्ध झाला.

- Advertisement -

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईमध्ये हाराष्ट्राच्या अन्य भागातून होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण १९६१ साली ४१.६ टक्के होते जे २००१ साली ३७.४ टक्के इतके झाले. मात्र, दुसरीकडे त्याचवेळी उत्तर प्रदेशातून होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाणही वाढले. १९६१ साली उत्तर प्रदेशातून मुंबईत १२ टक्के स्थलांतरीत येत होते तेच प्रमाण २००१ साली २४ टक्के झाले.

आकडेवारी काय सांगते…

२००१ साली एकूण १६.८७ लाख ऊर्दू भाषिक होते. २०११ मध्ये हे प्रमाण १४.५९ वर पोहोचले. वाढ झाली ती केवळ हिंदी भाषिकांच्या संख्येत. हिंदी मातृभाषा आहे सांगणाऱ्या लोकांची संख्या २५.८२  लाखावरुन, ३५.९८ लाखवर जाऊन पोहोचली. रिपोर्टनुसार, मूळ मराठी भाषिक कुटुंब विस्तार आणि मुंबईत वाढलेल्या जागांच्या किंमती या दोन प्रमुख कारणांमुळे ठाणे, रायगड आणि विरार याठिकाणी वास्तव्याला गेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -