घरमुंबई'मुख्यमंत्री आणि उद्धवजींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला'

‘मुख्यमंत्री आणि उद्धवजींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला’

Subscribe

राष्ट्रवादीचे आमदार जिंतेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, असा टोला जिंतेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वाधिक नेते शिवसेना-भाजपमध्ये पक्षांतर करत आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना-भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सर्वाधिक समावेश आहे. शुक्रवारी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आज शनिवारी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याआधी गणेश नाईक, चित्रा वाघ, सचिन अहिर यांनी देखील राष्ट्रवादीची साथ सोडली होती. त्यातच आता आणखी एकावर एक धक्के राष्ट्रवादीला बसत आहेत. दरम्यान, याच पाश्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जिंतेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, असा टोला जिंतेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

हेही वाचा – उदयनराजे भोसले यांचा भाजपात प्रवेश

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड नेमके काय म्हणालेत?

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, ‘मुख्यमंत्री आणि उध्दवजी केबिन मध्ये बोलत बसले होते. अचानक झंम्प्या तिथे कुतुहलाने बघायला गेला. तिथे उदयनराजे भोसले, भास्कर जाधव, गणेश नाईक, निंबाळकर, सचिन अहिर आणि इतरांना बघून तो ओरडत बाहेर आला, मुख्यमंत्री आणि उध्दवजीने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला म्हणून.’

- Advertisement -

उदयनराजेंवरही जितेंद्र आव्हाड यांची टीका

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक ट्विट करत  उदयनराजेंवरही टीका केली आहे. ‘साहेब उदयनराजें वर तुम्ही मानापासून प्रेम केले सतारातल्या आपल्या जवळच्याना दुखावलत त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलत पोटच्या पोरावणी प्रेम केलेत खरा तर तुमचा स्वभाव तसा नाही’, असे आव्हाड म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -