घरमुंबईजेएनपीटीचा रस्ता खचला, कामांच्या दर्जाबाबत शंका

जेएनपीटीचा रस्ता खचला, कामांच्या दर्जाबाबत शंका

Subscribe

मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा रस्ता खचला. त्यामुळे जेएनपीटीकडे जाणारी वाहतूक प्रभावित झाली.

उरण-कोट्यावधी रूपये खर्च करून बांधण्यात येत असलेला जेएनपीटीचा रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने या रस्त्याच्या कामाबद्दल शंका उपस्थित करण्यात येत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच हा रस्ता खचला असल्याचे जाणकारांचे
मत आहे. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा रस्ता खचला. त्यामुळे जेएनपीटीकडे जाणारी वाहतूक प्रभावित झाली. त्यामुळे ही वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळविण्यात आली आहे.

जेएनपीटीचे बहुचर्चित बंदर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कोट्यावधी रुपये खर्च करून या चौथ्या बंदरासाठी रस्ते बांधण्यात आले आहेत. मात्र निकृष्ट कामांमुळे हे रस्ते वारंवार खचत आहेत. जेएनपीटी बंदराचा विस्तार वाढत असल्याने जेएनपीटीकडे येणारे सर्व रस्त्यांचे रूंदीकरण, मजबुतीकरण आणि काँक्रीटीकरण सूरू आहे. जेनपीटीने जवळ जवळ 3 हजार कोटी रूपये यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. एनएचएआयच्या निगराणीखाली ही सर्व कामे सुरू आहेत. यामध्ये अनेक उड्डाणपुल आणि छोटे-मोठे पुल आहेत. जेएनपीटी पळस्पे मार्गावर (एनएच-348) पागोटे जंक्शनजवळ हा रस्ता खचला. चांगली पायलिंग न करता केवळ खाडीच्या दलदलीत या रस्त्याचा भराव केल्यामुळे हा रस्ता मधोमध खचला त्यामुळे या रस्त्याच्या बाजूने जाणारा सर्व्हीस रस्त्याला देखिल 1 ते दिड किलोमिटर पर्यंत भेगा
गेल्या असून या रस्त्याच्या बाजूलाच असलेली खारफुटी व चिखल देखिल दाबामुळे वरती आला आहे.

- Advertisement -

रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली तरी देखिल धोकादायक सर्व्हीस रोडवरून बिनधोकपणे वाहतूक सूरू होती. उशिरा याबाबत वाहतूक पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या रस्त्यांवरील वाहतूक बंद करून दुसर्‍या
मार्गावरून वळविण्यात आली. हा रस्ता खचल्यामुळे येथे सूरू असलेल्या उड्डाण पुलाला देखिल धोका निर्माण झाला आहे. या पुलाच्या एप्रोच रस्त्यासाठी हा भराव सूरू होता. जवळपास 100 ते 150 मिटर पर्यंत या भरावाची माती जमिनीत खचली आहे. दोन वर्षापूर्वी देखिल एनएचएआयने बांधलेला सिंगापूर पोर्टचा रस्ता देखिल मोठ्या प्रमाणात खचला होता.

या बाबत एनएचएआयचे प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यानी रस्ता खचण्याची कारणे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र नेमके कशामुळे हे घडले हे आत्ता सांगता येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 15 दिवसात हा रस्ता आम्ही पुर्ववत करून वाहतूक सुरळीत करू तोपर्यंत पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – वर्षा राऊत यांना पुन्हा एकदा ईडीचा समन्स

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -