घरमुंबईवालधुनी पुलावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू

वालधुनी पुलावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू

Subscribe

कल्याण आणि उल्हासनगरला जोडणाऱ्या वालधुनी पुलावर टेम्पो आणि मोटारसायकलमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

कल्याण आणि उल्हासनगरला जोडणाऱ्या वालधुनी पुलावर आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. भरधाव टेम्पो आणि मोटारसायकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जागीच ठार झाले आहेत. योगेश पवार आणि अनिल भिसे अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

मुरबाड येथील सरळगाव येथे राहणारे योगेश आणि अनिल हे दोघेही मोटरसायकलने येत असतानाच भरधाव टेम्पोने मोटारसायकल जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता कि मोटरसायकलचा अक्षरश: चकाचुर झाला होता तर रस्त्यावर रक्ताचा सडा पसरला होता. या अपघाताची माहिती मिळताच महात्मा फुले पेालिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पालिकेच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला महात्मा फुले पेालिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -