पालिकेच्या नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करणं आता गणेश मंडळांना खूप कठिण जात आहे. त्यामुळे गणेश मंडळांमध्ये आता नाराजीचा सूर पुढे येत आहे. याविषयावर ‘माय महानगर’च्या Facebook Livecमध्ये बोलताना समन्वय समितीला केवळ चॅनलवर चमकोगिरी करण्याची सवय आहे. ज्यावेळी गिरगावच्या राजाचे सामान उचलून नेण्यात आले. त्यावेळ समन्वय समिती गप्प का होती? समन्वय समितीने काहीच कारवाई केली नाही. मी समन्वय समितीचा निषेध करतो. अशा शब्दात ओम तांडव सार्वजनिक गणेश मंडळाचे संचालक गणेश जाधव यांनी समन्वय समितीवर टीका केली आहे. तसेच आत्तापर्यंत समन्वय समितीने गणेश मंडळांशी संपर्कच साधला नाही. हे समितीचे अपयश आहे. तर समिती किती लोकांची आहे हेच आम्हाला माहित नाही. असे देखील हितेश जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे समन्वय समिती आणि गणेश मंडळांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबईत गणेशोत्सवाला परवानगीच नाही! समन्वयाच्या अभावामुळे झाली बोंबाबोंब? विचारा प्रश्न आणि घ्या उत्तर | सहभाग – सौ किशोरी किशोर पेडणेकर Sandip Deshpande Kundan Agaskar आणि Hitesh JadhavMNS Adhikrut ShivSena | #MyMahanagar
Posted by My Mahanagar on Monday, August 20, 2018
मात्र, आम्ही कोणत्याही गणेश मंडळांना वाऱ्यावर सोडले नसल्याचे स्पष्टीकरण समन्वय समितीचे समन्वयक कुंदन आगस्कर यांनी दिले.
पालिकेचे गणेश मंडळांसाठीचे नियम
१ ) मंडपाच्या बाजूला १० फूट जागा सोडावी. जेणेकरून अग्निशमन दल, पादचारी, रुग्णवाहिका यांना कोणताही त्रास होणार नाही
२ ) मंडपासाठी पालिका, पोलीस, वाहतूक विभाग आणि अग्निशमन दलाची परवानगी घेणे आवश्यक
३ ) मंडपामध्ये फायर रेझिस्टंट सिस्टीम आवश्यक
४ ) गाड्यांच्या पार्किंगसाठी १०० मीटर दूर जागा असावी
५ ) मंडपाबाहेर मंडपाच्या नकाशाचा आराखडा असावा
६ ) मंडपासाठी खणलेले खड्डे १० दिवसांमध्ये बुजवावेत. त्याचे फोटो पालिकेला पाठवावेत
गणेश मंडळांच्या मागण्या
१ ) सायलेन्स झोनमधील गणेश मंडळांना लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी द्यावी.
२ ) गणेशोत्सवासाठी १० दिवस लाऊड स्पीकरची रात्री १२ पर्यंत परवानगी द्यावी.
३ ) मुंबईमध्ये सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. त्या ठिकाणावरून मिरवणुकीसाठी पर्यायी रस्ता द्यावा.