घरमुंबईअबब! देशाच्या आर्थिक राजधानीत ७४ कोटींचे पाणी चोरीला

अबब! देशाच्या आर्थिक राजधानीत ७४ कोटींचे पाणी चोरीला

Subscribe

मुंबईत तब्बल ७४ कोटी रुपयांची पाणी चोरीची घटना उघडकीस आली आहे. ६ जणांविरोधात गुन्हा दाखल.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या तसेच आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईत तब्बल ७३.१८ कोटी रुपयांच्या पाण्याची चोरी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जवळपास ११ वर्षे चाललेल्या या पाणी चोरी प्रकरणी ६ जणांविरोधात आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आझाद मैदान पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

- Advertisement -

आरोपींचा शोध सुरु

तब्बल ७३ कोटी रुपयांच्या पाण्याची चोरी झाल्याने आझाद मैदान पोलिसांनासुद्धा धक्का बसला आहे. मागील ११ वर्षांपासून ही चोरी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -