घरताज्या घडामोडीसोनसाखळीसाठी मित्राची केली निर्घृण हत्या; २४ तासांत पोलिसांनी आरोपीला केले अटक

सोनसाखळीसाठी मित्राची केली निर्घृण हत्या; २४ तासांत पोलिसांनी आरोपीला केले अटक

Subscribe

भिवंडी तालुक्यातील मोहंडूल ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कंरजोटी गावातील आकाश नारायण शेलार या २० वर्षीय कॉलेज युवकाची निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती. या हत्येप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला २४ तासात गजाआड केले आहे.

नक्की काय घडले?

या कॉलेज युवकाला अज्ञात मारेकऱ्याने मोबाईलवरुन संपर्क करून गावालगतच्या माळरानावर बोलावले होते. त्यावेळेस हात आणि डोक्यावर लाकडी बॅटने प्रहार करून शुक्रवारी सायंकाळी त्यांची निर्घृण हत्या केली. मग या हत्येप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक पडघा पोलीस आणि ठाणे ग्रामीणच्या गुन्हे अन्वेषण पथकामार्फत सुरू होते. हत्या झालेल्या आकाश याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी आणि मोबाईल गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ही हत्या सोनसाखळी चोरीसाठी केली असावी असा अंदाज वर्तवून पोलिसांनी तपास सुरू केला होता.

- Advertisement -

यावेळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आकाश याचा मोबाईल सीडीआर तपासणीसाठी टाकला असता मोबाईल लोकेशन करंजोटी गावातच दाखवत असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी कसून शोध घेतला असता गावातील मयुर मोतीराम जाधव (वय २०) याच्या घरात आढळून आला. त्यामुळे स्थानिक ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे एपीआय परशुराम लोंढे, पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे, पोह. प्रकाश साईल, संतोष सुर्वे, प्रविण हबळे, पोना.अमोल कदम, हनुमंत गायकर, सुहास सोनवणे आदींच्या पोलिस पथकाने मयुर यास शनिवारी मध्यरात्री ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली.

त्याने मित्र आकाश शेलार याच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्यासाठी त्याला माळरानावर बोलावून बॅटच्या सहाय्याने डोक्यावर, हातावर, मानेवर जोरदार प्रहार करून त्याला ठार मारले आणि गळ्यातील सोनसाखळी काढून घरात आणून ठेवली आहे, अशी कबुली त्याने दिली. सोनसाखळी घराच्या पोटमाळ्यावर ठेवली होती ती काढून पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. मयुर याने मित्राची हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर त्यास ताब्यात घेऊन जप्त केलेली सोनसाखळी आणि मोबाईल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पडघा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पडघा पोलीस ठाण्याचे एपीआय पवन चौधरी यांनी खुनी मयुर जाधव यास अटक करून रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले. त्याला २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – नगरसेविकेच्या पुढाकारामुळे नोकरीसाठी एनजीओने डांबलेल्या नऊ तरुणींची सुटका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -