मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेवरुन आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. आहे. ‘पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा’ अशी खोचक टीका नितेश यांनी ट्वीटद्वारे केली आहे. ‘पेंग्विनना गोंजारत बसण्यापेक्षा आणि नाइट लाइफसाठी आवाज उठवण्यापेक्षा शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महापालिका शहरातील खरे जीव का नाही वाचवत?’, असा सवाल नितेश यांनी ट्वीटद्वारे विचारला आहे. ‘या घटनेनंतर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु होईल आणि ब्रीज ऑडिटवर चर्चा होईल. मात्र, याचा परिणाम काहीच होणार नाही’, असंही नितेश यांनी म्हटलं आहे.
Rather than pampering Penguins n fighting for night life..why doesn’t Sena led BMC try saving real lives for a change!
Nw the same old blame game n bridge audit dialogues will start n absolutely nothing will happen!
Richest Muncipal corporation but zero value for life!— nitesh rane (@NiteshNRane) March 14, 2019
सीएसएमटी पुलाच्या दुर्घटनेला मुंबई महापालिका जबाबदार आहे का रेल्वे ? यावरुवन आरोप-प्रत्यारोप होत असताना, नितेश राणे यांनी महापालिका आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टार्गेट केलं आहे.