घरमुंबईमुंबई, ठाण्यात प्रदूषण घटले!

मुंबई, ठाण्यात प्रदूषण घटले!

Subscribe

जनता कर्फ्यूचा इफेक्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्युच्या केलेल्या आवाहनाला मुंबई, ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. मुंबई आणि ठाणेकरांनी मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत घरीच पसंत केले. त्यामुळे मुंबई, ठाण्यातील प्रदूषणात कमालीची घट नोंदवण्यात आली असून दररोजच्या तुलनेत मुंबई, ठाण्यातील प्रदूषण रविवारी कमी आढळले.

रस्त्यावर वाहने कमी धावत असल्यामुळे मुंबई, ठाण्यात आभाळ व हवा निरभ्र होती. लोकांनी सोशल मीडियावर म्हटले, दहा वर्षांत प्रथमच आभाळ स्वच्छ पाहण्यास मिळाले. सफर या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात म्हटले आहे की, रस्त्यावर वाहनांची रहदारी नसल्याने प्रदूषण कमी झाले असून, दिल्ली, मुंबई, ठाणे, पुणे आणि अहमदाबादमधील या शहरांत नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण (60-80%) आणि पीएम 2.5 (35-50 %) असे कमी नोंदवले गेले आहे. योग्य हवामानाच्या स्थितीत नायट्रोजन डायऑक्साइडची पातळी मुख्यत: उत्सर्जनाच्या मुख्य स्त्रोतांवर (वाहनांची रहदारी) अवलंबून असते. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या कमी झालेली आहे.

- Advertisement -

बीकेसी, वरळी, ठाणे, नेरुळमधील प्रदूषणात कपात नोंदवली गेली आहे. परंतु कुलाबा, अंधेरी, मालाड आणि माझगाव येथील प्रदूषणाच्या पातळीत बदल झालेला नाही. 2.5 मायक्रोमीटरपेक्षा लहान आकारमानाच्या अतिसूक्ष्म धूलिकणांमध्ये घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे प्रदूषणात 118 अतिसूक्ष्म धूलिकणांमध्ये कपात झालेली आहे. हे अतिसूक्ष्म धूलिकण श्वसनामार्फत फुफ्फुसांत खोलवर जाऊन पोहोचतात व फुफ्फुसांच्या रचनेमुळे आतमध्ये दीर्घकालापर्यंत साठून राहतात. वाहनांतून बाहेर पडणार्‍या धुरांमध्ये हे सूक्ष्म कण असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -