घरमुंबईमुंबई महापालिकेचा प्रताप; वर्षभरातच पालिका शाळांत ‘शून्य’ कुपोषण!

मुंबई महापालिकेचा प्रताप; वर्षभरातच पालिका शाळांत ‘शून्य’ कुपोषण!

Subscribe

अवघ्या वर्षभरात मुंबईत पालिका शाळांमधल्या अल्पवजनी मुलांमध्ये तब्बल ८४ टक्के घट झाल्याची अजब आकडेवारी पालिकेकडून देण्यात आली आहे. त्यावर प्रजा फाऊंडेशनने आक्षेप घेतला आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषक आहार दिल्याने कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. २०१६-१७ या वर्षात एकही कुपोषित विद्यार्थी आढळला नसल्याचा अजब दावा मुंबई महापालिकेने केला आहे. विशेष म्हणजे त्याआधीच्या म्हणजे २०१५-१६ या कालावधीत महानगरपालिका शाळांच्या आरोग्य तपासणी दरम्यान ६४ हजार ६८१ विद्यार्थी कुपोषित आढळले होते. पण पुढच्याच वर्षी मुंबईत एकही कुपोषित मूल नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय गेल्या वर्षी महापालिकेने पालिका शाळांमधील ‘कमी वजन’ असणाऱ्या तब्बल ७३ हजार ११२ विद्यार्थ्यांची नोंद केली होती. पण अवघ्या वर्षभरातच त्यात एकूण ८४ टक्के घट होऊन हा आकडा ११ हजार ७२० पर्यंत खाली आला.

पालिकेच्या या अजब आकडेमोडीवर आता प्रजा फाउंडेशनने शंका व्यक्त केली आहे. वर्षभरात कुपोषित बालकांमध्ये एवढी घट कशी होऊ शकते? याचा जाब फाऊंडेशनने मुंबई महापालिकेला विचारला आहे. प्रजा फाउंडेशननेच महानगरपालिकेकडून माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मागवली होती. त्यात ही बाब समोर आली आहे.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – खासगी शाळांच्या मनमानी शुल्कवाढीला बसणार चाप


मागील तीन वर्षांत मुंबईतील पालिका शाळांतील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण चौपटीने वाढले होते. तीन वर्षांपूर्वी कुपोषणाचे प्रमाण ८ टक्के इतके होते. २०१५-१६ मध्ये ही संख्या ३४ टक्क्यांवर पोहोचली आणि आता २०१७-१८ मध्ये फक्त ५ टक्के कमी वजनाची बालके आढळली असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने केला आहे. त्यासोबतच २०१६ -१७ दरम्यान महानगरपालिकेने परिभाषेत बदल घडवत ‘कुपोषित’ ऐवजी ‘अल्पवजनी आणि कमी वजनाचा’ असा उल्लेख करायला सुरुवात केली आहे. तसंच हा बदल नेमका कोणत्या कारणासाठी केला आहे? याचं काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाही. ज्याचं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने देणं अपेक्षित आहे, असं मत प्रजा फाउंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी नीताई मेहता यांनी मांडले आहे.

२०१५-१६ मध्ये ६४ हजार ६८१ कुपोषित विद्यार्थी आढळून आले होते. पण, २०१६-१७ मध्ये एकही विद्यार्थी कुपोषित आढळला नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. पण, जर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा आकडा इतका कमी झाला, तर मग पालिका आयुक्तांनी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये पोषण पूरक आहारासाठी २७.३८ कोटींचा अतिरिक्त निधी कशासाठी दिला? आयसीडीएस आणि शालेय आरोग्य कार्यक्रम यांच्या अल्पवजनी आकडेवारीत इतका फरक कसा?

मिलिंद म्हस्के, संचालक, प्रजा फाउंडेशन

- Advertisement -

हेही वाचा – महापालिकेच्या शाळांना वाळवी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -