घरमुंबईदम असेल तर आरोप सिद्ध करा

दम असेल तर आरोप सिद्ध करा

Subscribe

मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया योजनेची शनिवारी राज ठाकरेंनी टीका केल्यानंतर भाजपचे नेते विनोद तावडेंनी ठाकरे यांच्या पक्षावर गंभीर टीका केली. तावडेंच्या टीकेला उत्तर देताना, तावडेंमध्ये दम असेल, तर त्यांनी आम्ही केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध करावे अन्यथा राजकारण सोडावे, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात टीका राज ठाकरेंनी मोदींवर टीका केल्यानंतर तावडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. एवढा अभ्यास पक्षासाठी केला असता तर फायदा झाला असता आधी कष्ट घेतले असते तर दुसर्‍याला मदत करायची वेळ आली नसती, असे तावडे म्हणाले. तावडेंच्या या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना देशपांडे म्हणाले, माझे तावडे यांनाच नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आव्हान आहे. त्यांनी ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, नाही तर फालतू बडबड बंद करावी. आम्ही हरिसाल येथील जी पोलखोल केली त्याबाबत तावडे जे म्हणाले आहेत. त्यांना माझे खुले आव्हान आहे. त्यांनी आमच्यासोबत यावे आणि खरे खोटे करावे. आम्ही सादर केलेली एक गोष्टदेखील खोटी निघाली तर आम्ही राजकारण सोडू नाहीतर त्यांनी राजकारण सोडावे. राज यांच्या वाक्यांची मोडतोड करून चुकीचा अर्थ काढला जात आहेत. ती भाजपची जुनी सवय आहे. खोट बोला पण रेटून बोला, असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -