घरमुंबईअतिरेक्यांचे तळ उद्धवस्त करण्यासाठी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे - आठवले

अतिरेक्यांचे तळ उद्धवस्त करण्यासाठी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे – आठवले

Subscribe

पाकिस्ताना धडा शिकवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन एकजुटीने उभे राहुया असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

‘शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी पाकिस्तानशी आरपारची लढाई लढली पाहिजे’ असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. पाकिस्तानशी युद्ध झाले तर काश्मीर आपल्या ताब्यात राहिलच, मात्र संपूर्ण पाकिस्तानलाही आपल्या ताब्यात घेऊ एवढी ताकद आपल्या भारतीय सैन्यात असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. चेंबूर येथे पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

देशाच्या संरक्षणासाठी सैन्यात भरती व्हा

‘सीमेपलीकडे असलेल्या अतिरेक्यांचे तळ उद्धवस्त करण्यासाठी, देशाच्या संरक्षणासाठी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे’, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच ‘दहशतवादी हल्ल्यासारख्या प्रसंगात देश एकसंघपणे भरातीय सैनिकांच्या पाठीशी उभा राहतो. तसेच सैन्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खात संपूर्ण देश सहभागी असून रिपब्लिकन पक्ष सरकारच्या पाठीशी उभा आहे’, असं यावेळी रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच पाकिस्ताना धडा शिकवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपापसातील मतभेद विसरुन एकजुटीने उभे राहुया असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.

- Advertisement -

वाचा – साश्रू नयनांनी दिला वीरपुत्रांना अखेरचा निरोप

वाचा – नौशेरामधील आयईडीच्या स्फोटात एक अधिकारी शहीद

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -