घरमुंबईमेट्रोच्या भूमिपूजनासाठी येणाऱ्यांना दुष्काळग्रस्तांसाठी मुहूर्त नाही?

मेट्रोच्या भूमिपूजनासाठी येणाऱ्यांना दुष्काळग्रस्तांसाठी मुहूर्त नाही?

Subscribe

मोदी सरकारने हयातीपासून ते स्मशानभूमीपर्यंत नागरिकांना छळण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू केला आहे, असा आरोप विखे पाटील यांनी यावेळी केला. आज कल्याणमधील स्मशानभूमीचा रस्ता बंद होता.

मेट्रोच्या भूमिपूजनासाठी वेळ असलेल्या पंतप्रधानांना तीव्र दुष्काळात होरपळून निघालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा द्यायला मुहूर्त का सापडत नाही? असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्णल विखे पाटील यांनी केला आहे. विखे पाटील यांनी मंगळवारी लोणी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दुष्काळाबाबत सरकारच्या उदासीन भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला. यावेळी ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रात टिळक, दाते, ढवळे, रुईकर आणि फडणवीस अशी अनेक पंचांगे उपलब्ध आहेत. मात्र, पंतप्रधानांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी एकही मुहूर्त सापडत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. राज्य सरकारची कर्जमाफी फसल्यामुळे किमान केंद्र सरकारकडून तरी सरसकट कर्जमाफी मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. मात्र केंद्राची कर्जमाफी जाहीर करायला पंतप्रधानांना मुहूर्त का मिळत नाही? अशी विचारणा विरोधी पक्षनेत्यांनी केली. पंतप्रधान येणार म्हणून आज कल्याणमध्ये स्मशानभूमी बंद ठेवण्यात आली. केवळ पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी अंत्ययात्रा काढण्यासही बंदी घातल्याची बाब निषेधार्ह असून, या सरकारने हयातीपासून ते स्मशानभूमीपर्यंत नागरिकांना छळण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू केला आहे, असा आरोप विखे पाटील यांनी यावेळी लावला.

दुष्काळग्रस्तांचा मात्र अपेक्षाभंग…

सरकारकडून भरीव दिलासा मिळत नसल्यानमुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, असंही विखे पाटील यावेळी म्हणाले. मेट्रोच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रात आलेल्या पंतप्रधानांनी दुष्काळी भागाला भेट द्यायला हवी होती. पंतप्रधान दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात येताना शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीचे पॅकेज आणतील, अशी अपेक्षा होती. पण मेट्रोचे भूमिपूजन करताना पंतप्रधानांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची साधी आठवणही झालेली दिसत नाही. सरकारने दुष्काळग्रस्तांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आपण सातत्यासने करीत आहोत. विधीमंडळाच्या गेल्या अधिवेशनातही या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. राज्य सरकार सांगते आम्ही केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने एका पाहणी पथकाला दोन दिवसांच्या दौऱ्यावर पाठवले. पण दोन दिवसांत त्यांनी काय पाहणी केली? या पथकाने दुष्कापळग्रस्तद भागाची रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात पाहणी केली. हे पथक पाहणीसाठी आले होते की पर्यटनासाठी? याचाच शोध घेण्याची वेळ आल्याची बोचरी टीका विखे पाटील यांनी केली.

- Advertisement -

 कालच्या दुर्घटनेनंतर भूमिपूजन रद्द व्हायला हवं होतं…

भूमिपूजनाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, अंधेरी येथील कामगार हॉस्पिटलला आग लागून ८ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर सरकारने भूमिपूजनाचा कार्यक्रमच रद्द करायला हवा होता. पण कोणत्याही वेदना आणि संवेदना नसलेल्या या सरकारने केवळ श्रध्दांजली वाहून आपली जबाबदारी झटकली. या घटनेची केवळ चौकशी करून भागणार नाही तर त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजे. सरकारने मेट्रोचे भूमिपूजन तर केले पण अजूनही त्याच्या निविदेची माहिती सार्वजनिक झाली नाही. त्यामुळे सरकारने ही निविदा नेमकी कशी आहे? याची माहिती जाहीर करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण शिवसेनेला देण्यात आले नसल्याबाबत भाष्यर करताना ते म्हणणाले की, शिवसेनेला आता यत्किंचितही स्वारभिमान शिल्लक राहिलेला नाही. शिवसेनेत लाचारांच्या फौजा निर्माण झाल्याी आहेत. त्यामुळे भाजपने कशीही वागणूक दिली तरी ते सरकारमध्येिच टिकून राहतील. पंतप्रधानांनी बोलावले नाही तरी ते सत्तेतच बसून राहतील, असा हल्लाबोल त्यांनी शिवसेनेवर केला. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -