घरमुंबईराष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या आरएसएसनेच केली - अबू आझमी

राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या आरएसएसनेच केली – अबू आझमी

Subscribe

आरएसएसवाल्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या केली. ही हत्या त्यावेळी काँग्रेसचे नेते थांबवू शकले नाही. आरएसएस तर काँग्रेसचीच पैदास असून त्यांच्याच कब्ज्यात काँग्रेस आजही आहे, असे वक्तव्य आमदार अबू आजमी यांनी केले.

आरएसएसवाल्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या केली. ही हत्या त्यावेळी काँग्रेसचे नेते थांबवू शकले नाही. आरएसएस तर काँग्रेसचीच पैदास असून त्यांच्याच कब्ज्यात काँग्रेस आजही आहे, असे खळबळजनक वक्तव्य समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमदार अबू असीम आजमी यांनी भिवंडीतील एका जाहीर सभेत केले. विशेष म्हणजे २०१४ च्या निवडणुकीतील प्रचार सभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधींनी आरएसएसवाल्यांनी महात्मा गांधींना गोळ्या घालून त्यांची हत्या केल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर भिवंडी आरएसएसचे कार्यवाहक राजेश कुंटे यांनी अक्षेप घेत त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्या दाव्याची सुनावणी अद्यापही भिवंडी कोर्टात सुरु आहे. असे असतानाच आमदार अबू आजमी यांनी महात्मा गांधींची हत्या आरएसएसनेच केल्याचे विधान केल्याने पुन्हा भिवंडी लोकसभा मतदार संघात खळबळ उडाली आहे.

भाजपा विरोधी वक्तव्य नाही 

भिवंडी लोकसभा निवडणूकीत सपा-बसपा युतीचे उमेदवार डॉ. नुरुद्दीन अंसारी यांच्या प्रचारासाठी भिवंडीतील दिवंशाह दर्गा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार अबू आजमी यांनी खळबळजनक वक्तव्य केले. आझमी पुढे म्हणाले की काँग्रेस सर्व देशभर मतांची विभागणी करून भाजपाला जिंकवण्याचे काम करत आहे. त्यामुळे खरे वोट कटवा काँग्रेस असून हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल, असा आरोप देखील त्यांनी प्रचार सभेत केला. मात्र सभेदरम्यान भाजपा विरोधात त्यांनी अधिक बोलणे टाळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

आरएसएस काँग्रेसचीच पैदास 

आरएसएसचा जन्म काँग्रेस पक्षाने केला. त्यामुळे त्यांच्याच बोलण्यावरून आताची काँग्रेस कार्य करत असून काँग्रेसला लगाम घालण्याचे काम समाजवादी विचारांच्या पक्षाने केले असल्याचे सांगत काँग्रेस उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल आदी राज्यांसह अनेक राज्यात तेथील निधर्मी पक्षांची मते खाण्यासाठी उभी असल्याने खरे वोट कटवाची भूमिका काँग्रेस करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या विधानावर बोलताना त्यांनी केलेले विधान हे फुकटात प्रसिद्धीसाठी केले आहे. समाजवादी पक्ष आतंकवादकडे आतंकवाद म्हणूनच बघते. त्यास कोणत्या धर्माचे रंग देणे चुकीचे असून महात्मा गांधी यांची हत्या कारणाऱ्यांची आणि वसईमधून पकडलेल्या अभिनव भारत तसेच सनातनच्या पकडलेल्या आरोपींची जात तपासली तर मोदींचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल, असा आरोपही त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -