घरमुंबईपालकांचे आर्थिक शोषण करणार्‍या शाळांवर होणार कारवाई

पालकांचे आर्थिक शोषण करणार्‍या शाळांवर होणार कारवाई

Subscribe

बिलाबाँग इंटरनॅशनल, रायन इंटरनॅशनल आणि राजाराणी मल्होत्रा विद्यालय या तीन शाळांच्या मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी पालकांसोबत बच्चू कडू यांची मंत्रालयात भेट घेतली.

कोरोना संकटकाळात शाळा व्यवस्थापनांकडून पालकांचे आर्थिक शोषण होत असेल, तर त्यांना जाब विचारून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. बिलाबाँग इंटरनॅशनल, रायन इंटरनॅशनल आणि राजाराणी मल्होत्रा विद्यालय या तीन शाळांच्या मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी पालकांसोबत बच्चू कडू यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी पालकांच्या समस्यांचा पाढा वाचला.

मुंबईसह राज्यातील अनेक शाळा, विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या आयसीएसई, सीबीएसई, इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळांच्या व्यवस्थापनांकडून पालकांचे आर्थिक शोषण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येत आहेत. कोरोना काळातही शाळा व्यवस्थापनांनी शुल्कामध्ये वाढ केली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या पालकांना शुल्क भरणे शक्य होत नाही. यासंदर्भात पालकांनी शाळा व्यवस्थापनांशी चर्चा करण्याचा, संवाद साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र शाळा व्यवस्थापनांनी पालकांच्या समस्यांना गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे पालकांनी मनसेकडे धाव घेतली. पालकांच्या समस्या लक्षात घेऊन शालिनी ठाकरे यांनी गुरुवारी बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शुल्क वाढ आणि वापरात नसलेल्या सुविधांशी संबंधित शुल्क, डिजिटल शिक्षणाचा दैनंदिन कालावधी आणि गुणवत्ता, तसेच शिक्षण हक्क (आरटीई) कायद्याची अंमलबजावणीसंदर्भातील चौकशी अहवाल मागवण्यासाठी आणि दोषी शाळा व्यवस्थापनांवर कठोर कारवाईसाठी विशेष अधिकार्‍यांची किंवा विशेष समितीची नेमणूक करावी व अडचणीत सापडलेल्या पालकांना ठोस दिलासा द्यावा, अशी मागणी शालिनी ठाकरे यांनी शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांकडे केली. यावर पालकांचे आर्थिक शोषण करणार्‍या शाळांवर कारवाई करण्याचे आश्वासन बच्चू कडू यांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -