घरमुंबईअभिव्यक्ती समृद्ध करण्यासाठी सोशल मीडिया पूरक - विनोद तावडे

अभिव्यक्ती समृद्ध करण्यासाठी सोशल मीडिया पूरक – विनोद तावडे

Subscribe

पहिल्या 'मराठी सोशल मीडिया संमेलना'चे उद्घाटन विनोद तावडे यांच्या हस्ते पार पडले.

”सोशल मीडिया म्हणजे करमणूक, वेळ घालविण्याचे साधन नाही तर या माध्यमामुळे चांगली मूल्यनिर्मिती, समृद्ध विचार आणि विविध विषयांची सकारात्मक चर्चा होत असल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडिया आपली अभिव्यक्ती समृद्ध करण्यासाठी पूरक आहे,” असे मत मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सायबर, राज्य मराठी विकास संस्था आणि पुण्यातील डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ आणि १८ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पहिले ‘मराठी सोशल मीडिया संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन आज मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisement -

सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी जन जोडले गेले

पहिले ‘सोशल मीडिया संमेलनात’ बोलताना तावडे म्हणाले की, ”माहिती आणि ज्ञानाचे विकेंद्रीकरण करण्यात या माध्यमाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सोशल मीडियामुळे आज जागतिक स्तरावरील मराठी जन एकत्र बांधला गेला असून मराठीशी असलेली नाळ अधिक घट्ट झाली आहे. येणाऱ्या काळात मराठी भाषा विभागामार्फत प्रचलित साहित्यिक आणि सोशल मीडियावर लिहिणाऱ्या साहित्यिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पहिल्या ‘सोशल मीडिया संमेलना’साठी राज्य शासन पाठिशी असून येणाऱ्या काळात हे माध्यम अधिक शक्तीशाली करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.”

सोशल मीडियात शासकीय व्यवस्था बदलण्याचं सामर्थ्य

‘मराठी सोशल मीडिया संमेलन’ आयोजित करणे ही काळाची गरज आहे. आज सोशल मीडियावर येणारे साहित्य याला साहित्य मानावे की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून मी आपणास आश्वस्त करतो की, सोशल मीडियावर लिहिला जाणारा मजकूर हा साहित्य प्रकारच आहे. आजची तरुणाई या माध्यमाला आपलेसे करुन या माध्यमात अधिक उत्तमपणे व्यक्त होत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सांगली, सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी आलेला महापूर. या महापूराच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दाखविल्याच. पण सोशल मीडियावर तर विविध मजकूर, बातम्या यांचा महापूर पहायला मिळाला. आणि त्यामुळेच या माध्यमाचे अस्तित्त्व आपण नाकारुन चालणार नाही. कारण हे माध्यम केवळ तरुणपिढीच्या मनोरंजनाचा विषय राहिला नसून, शासकीय व्यवस्था बदलण्याचं सामर्थ्य या माध्यमात असल्याचे तावडे यांनी नमूद केले.

- Advertisement -

हेही वाचा – राणे काँग्रेसमध्ये गेले नसते तर आज राज्याचे चित्र वेगळे असते

सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाई वाचनाकडे वळेल

दोन वर्षापूर्वी मराठी भाषा दिनानिमित्ताने विकिपिडीयासाठी एक पान लिहा असे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी या आवाहनाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. सोशल मीडियावर मांडलेले विचार, साहित्य आपण सर्वांनी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. सोशल मीडियाच्या आवडीमुळे आजची तरुणाई पुन्हा वाचनाकडे, वर्तमानपत्रांकडे वळेल, असा विश्वास वाटत असल्याचे श्री. तावडे आपल्या भाषणात म्हणाले.

असे असेल संमेलन

दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात वादविवाद, मुलाखती, करमणुकीचे कार्यक्रम, कविता वाचन, चर्चासत्रे अशा अनेकविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. मराठी भाषेत व्यक्त होणाऱ्या लेखक, कवी, अभिनेते, चित्रकार, छायाचित्रकार व विचारवंतांना प्रोत्साहन देण्याचा आणि सामाजिक, भाषिक आणि कलात्मक देवाणघेवाणीतून मराठी भाषेला समृद्ध करण्याचा उद्देश या संमेलनाच्या आयोजनामागे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -