घरमुंबईमुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी नोबेल मिळवावे

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी नोबेल मिळवावे

Subscribe

सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स यांची इच्छा

भविष्यात मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नोबेल पारितोषिक मिळावे, अशी इच्छा प्रख्यात नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स यांनी व्यक्त केली. मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ शुक्रवारी विद्यापीठाच्या सर कावसजी जहाँगीर सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते.

प्रख्यात नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ झाला. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलसचिव डॉ. सुनील भिरुड, डॉ. अर्जुन घाटुळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहानपणापासूनच मला कोडे, वेगवेगळे खेळ आणि गणिताची आवड होती. थोडे मोठे झाल्यावर डिक्टेटिव्ह व्हावे असे वाटू लागले. अजून मोठे झाल्यावर रसायनशास्त्राची आवड निर्माण झाली आणि मग ऑर्गनिक केमिस्ट्रीमध्ये पीएचडी पूर्ण केली. हॉवर्ड विद्यापीठात प्रवेश न घेता मी विसकोनसिन विद्यापीठात शिकायला गेलो. आज नोाबेल पारितोषिक मिळवणारा मी माझ्या विद्यापीठाचा पहिला विद्यार्थी ठरलो आहे. त्याचप्रमाणे भविष्यात मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाही नोबेल पारितोषिक मिळावे, अशी माझी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

आपल्याला मिळालेली संधी जितकी महत्त्वाची असते तितकीच वेळोवेळी नशिबाने दिलेली साथही महत्त्वाची ठरते. चिकाटीने काम करत असताना आपल्यासमोर विविध संधी येतील त्यावेळी आपले पॅशन आपल्याला पूर्ण करता आले पाहिजे. करिअरमध्ये यश मिळेल की नाही याचा विचार करण्यापेक्षा निवडलेल्या क्षेत्रात चिकाटीने काम केल्यास तुमच्या कामामुळे तुम्हाला ओळख मिळेल. ध्येय निश्चित केल्यास आपल्या समोर येणार्‍या प्रत्येक गोष्टींकडे आपण संधी म्हणून पाहतो. त्यामुळे आयुष्यात नेमके काय करायचे आहे हे विद्यार्थ्यांनी ओळखणे आवश्यक आहे, असा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. केलेल्या कामामुळे सन्मान मिळेल की नाही यापेक्षा नोबेल पारितोषिकामुळे वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची संधी मला मिळाल्याचे मी भाग्य समजतो. आजचे विद्यार्थी हुशार असून योग्य संधी कशी निवडायची हे त्यांना माहीत आहे. मात्र, असे असले तरी आपल्या पारितोषिकाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी होणे हे जास्त महत्त्वाचे आहे, असे रॉबर्ट्स यावेळी म्हणाले.

क्यूएस भारतीय पारंपरिक विद्यापीठांच्या श्रेणीत मुंबई विद्यापीठ महाराष्ट्रात पहिल्या तर भारतात चौथ्या क्रमांकावर आहे. संशोधन ही देशाच्या आर्थिक विकासाची गुरुकिल्ली आहे. विद्यापीठ विभागांमध्ये 82 मान्यताप्राप्त पीएचडीधारक तयार झाले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरला सांस्कृतिक वारसा जतन करण्याबद्दल नुकताच एशिया पॅसिफिक पुरस्कार मिळाल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी यावेळी सांगितले. विविध विद्याशाखांतील 1 लाख 93 हजार 589 विद्यार्थ्यांना पदव्या दिल्या. 332 विद्यार्थ्यांना पीएचडी आणि एमफिल तर 52 विद्यार्थ्यांना पदके देण्यात आली.

- Advertisement -

खेळाला महत्त्व द्या
आपल्या आवडत्या खेळाला पुढे घेऊन जा, कारण खेळामुळे तुमचे मन स्वस्थ राहण्यास मदत होते. दररोज काहीतरी नवीन शिकायचे आहे हे ठरवले तर तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी बनते. खेळामुळे तुमचे मन, शरीर तंदुरुस्त राहते, असा सल्लाही सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स यांनी विद्यार्थ्यांना दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -